Friday, November 5, 2021

भारत सामान्यज्ञान महत्वाचे 100 प्रश्न


भारताचा इतिहास महत्वाचे 100 प्रश्न

01.चाफेकर बंधूनी रँडची हत्या केव्हा केली ?
     २२ जून १८९७
02. काकोरी कट केव्हा झाला ?
     ९ ऑगस्ट १९२५
03.  मीरत कट केव्हा झाला ?
       १९२९
04. चितगाव कटामध्ये कोणाचा विशेष सहभाग होता ?
      स्त्रियांचा
05. किसान सभेची स्थापना कोणी केली ?
       बाबा रामचंद्र (१९१८
06. पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणास ओळखले जाते ?
      आचार्य विनोबा भावे
07. क्रिप्स योजना केव्हा सुरु झाली ?
      १९४२ साली
08. त्रीमंत्री योजना केव्हा जाहीर झाली ?
      १६ मे १९४६ साली
09. राष्ट्रीय सभेची स्थापना कोणी केली ?
       ए.ओ.ह्यूम
10.  आर्थिक निसःरणाचा सिद्धांत कोणी मांडला ?
       दादाभाई नौरोजी
11. १८८५ साली सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली ?
       न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे
12. १८९० साली औद्योगिक परिषदेची स्थापना कोणी केली ?
      न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे
13. मुंबईचा सिंह म्हणून कोणास ओळखले जाते ?
      फिरोजशहा मेहता
14.  बॉम्बे क्रॉनिकल  हे वृत्तपत्र कोणी सुरु केले ?
       फिरोजशहा मेहता
15.  पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केव्हा झाली ?
       १८८० साली
16. १८८१ साली केसरी (मराठी ),मराठा(इंग्रजी ) ही वर्तमानपत्रे कोणी सुरु  
       केली ?
       लोकमान्य टिळक
17. फर्ग्युसन कॉलेजची स्थापना कोणी केली ?
      लोकमान्य टिळक (१८८५)
18. शिवजयंती व गणेशोत्सव कोणी सुरु केले ?
      लोकमान्य टिळक
19. गीतारहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला ?
      लोकमान्य टिळक
20.  घटना समितीचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते ?
      दिल्ली
21. घटना समितीचे हंगामी अध्यक्ष कोण होते ?
      सच्चिदानंद सिन्हा
22. घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा भरले होते ?
     ९ डिसेंबर , १९४६ साली
23. ११ डिसेंबर ,१९४६ रोजी घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची  
      निवड झाली ?
      डॉ.राजेंद्रप्रसाद
24. घटना समितीने संविधान केव्हा स्वीकृत केले ?
      २६ नोव्हेंबर ,१९४९ रोजी
25. भारतीय घटना केव्हा अंमलात आली ?

       २६ जानेवारी १९५० रोजी

 


 

             YouTube videos


https://www.youtube.com/playlist?list=PLkEVI7wPogWfz8ydsLQkAgNS09pOVWS0c


 5 वी शिष्यवृत्ती परीक्षा सराव संच

पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा सराव संच

https://www.youtube.com/playlist?list=PLkEVI7wPogWfz8ydsLQkAgNS09pOVWS0c


 


26. भारतीय राष्ट्रीय ध्वजास घटना समितीने केव्हा संमती दिली ?
      २२ जुलै , १९४७ रोजी
27. भारतीय राष्ट्रीय ध्वजाचे रुंदी व लांबीचे गुणोत्तर किती आहे ?
       २ : ३
28. घटना समितीचे सल्लागार कोण होते ?
     बी.एन.राव
29. भाषिक तत्वावर स्थापन झालेले देशातील पहिले राज्य ?
     आंध्रप्रदेश
30. घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?
      डॉ.बाबासाहेब आंबेडकर
31. घटना समितीने राष्ट्रगीतास संमती केव्हा दिली ?
     २४ जानेवारी ,१९५० रोजी
32. राष्ट्रगीत किती सेकंदात गायले जाते ?
      ५२ सेकंदात
33. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ?
       मोर
34. भारताचे राष्ट्रीय फळ कोणते ?
     आंबा
35. भारताची राष्ट्रीय नदी कोणती ?
      गंगा
36. राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता ?
      डॉल्फिन
37. राष्ट्रीय लिपी कोणती ?
      देवनागरी
38. भारताची राष्ट्रभाषा कोणती ?
      हिंदी
39. अमेरिकेमध्ये गदर हे वर्तमानपत्र कोणी सुरु केले ?
      लाला हरदयाळ
40.  मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा केव्हा अस्तित्वात आला ?
       १९०९ साली
41. कोणत्या कायद्याने भारतीय संघराज्याची कल्पना मान्य करण्यात
      आली ?
       १९३५ कायद्याने
42. देशात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका केव्हा सुरु झाल्या ?
      १९५२ साली
43. भारत-पाकिस्तान युद्ध केव्हा झाले ?
      १९६५ साली
44. भारत-चीन युद्ध केव्हा झाले ?
      १९६२ साली
45. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण ?
      यशवंतराव चव्हाण
46.  ‘जय जवान ,जय किसान’ ही घोषणा कोणी दिली ?
      लालबहादूर शास्त्री
47.  ईस्ट इंडिया असोशिएशियनची स्थापना कोणी केली ?
       दादाभाई नौरोजी
48. दर्पण हे मराठी साप्ताहिक कोणी सुरु केले ?
       बाळशास्त्री जांभेकर
49. लोकहितवादी या नावाने कोणास ओळखले जाते ?
      गोपाळ हरी देशमुख
50. मानवधर्म सभा व परमहंस सभा कोणी स्थापन केली ?
      दादोजी पांडुरंग तर्खडकर
51. भारताशी सर्वप्रथम व्यापारी संबंध कोणी प्रस्थापित केले ?
     पोर्तुगाल
52. २३ जून १७५७ रोजी कोणती लढाई झाली ?
      प्लासीची
53. २३ ऑक्टोबर १७६४ रोजी कोणती लढाई झाली ?
      बक्सारची
54. स्वराज्य ,स्वदेशी ,बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतुःसूत्रीचा पुरस्कार
      कोणी केला ?
      लोकमान्य टिळक
55. १९१७ च्या राष्ट्रसभेच्या कोलकता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
      अँनी बेझंट
56. भारताच्या इतिहासातील कोणता कायदा काळा कायदा म्हणून  
     ओळखला जातो ?
      रौलट कायदा (१९१९)
57.  रौलट कायदा कधी अस्तित्वात आला ?
       १९१९
58. जालियानवाला बाग येथे निरपराध लोकांवर गोळीबार करणारा इंग्रज  
      अधिकारी कोण होता ?
       जनरल डायर
59. जालियानवाला बाग हत्याकांडाच्या चौकशीसाठी कोणते कमिशनर
       नेमले होते ?
        हंटर कमिशनर
60. खिलापत चळवळ कधी सुरु झाली ?
      १९१९ साली
61. खिलापत चळवळीचे अध्यक्ष कोण होते ?
      महात्मा गांधी
62. स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली ?
        चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू
63. १९३४ मध्ये समाजवादी पक्षाची स्थापना कोणी केली ?
      जयप्रकाश नारायण
64. सविनय कायदेभंगाचा लढा केव्हा सुरु झाला ?
     १९३० साली
65. चले जाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला ?
      पंडित जवाहरलाल नेहरू
66. महात्मा गांधी यांची हत्या केव्हा झाली ?
      ३० जानेवारी १९४८
67. महात्मा गांधी यांची हत्या कोणी केली ?
       नथुराम गोडसे
68. १२ मे १८५७ रोजी क्रांतिकारकांनी कोणास दिल्लीचा बादशहा म्हणून
      घोषित केले ?
      बहादूरशाह
69. ३० जून १८५७ रोजी क्रांतिकारकांनी कोणास पेशवा म्हणून
       घोषित केले ?
      नानासाहेब पेशवे (कानपूर येथे )
70. १८५७ च्या उठावाची पूर्वनियोजित तारीख कोणती ?
      ३१ मे १८५७
71. १८५७ च्या उठावाच्या वेळी क्रांतिकारकांचे मुख्य केंद्र कोणते होते ?
       दिल्ली
72. संवाद कौमुदी हे पाक्षिक कोणाचे आहे ?
      राजा राममोहन रॉय
73. आत्मीय सभा या संघटनेची स्थापना कोणी केली ?
      राजा राममोहन रॉय
74. १८७५ साली आर्य समाजाची स्थापना कोणी केली ?
       स्वामी दयानंद सरस्वती
75.  ब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली ? (१८२८)
       राजा राममोहन रॉय
76. गुरुकुल ही शिक्षणसंस्था कोणी चालू केली ?
      स्वामी श्रद्धानंद
77. १८९७ मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली ?
      स्वामी विवेकानंद
78. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन १८८५ मध्ये कोठे भरले ?
       मुंबई
79. राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण ?
      व्योमेशचंद्र बॅनर्जी
80. मुस्लीम लीगची स्थापना केव्हा झाली ?
      १९०६ साली (ढाका येथे )
81. मुस्लीम लीगची स्थापना कोठे झाली ?
      ढाका येथे
82. मुस्लीम लीगची स्थापना कोणी केली  ?
      नवाब सलीमुल्ला
83. संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव कोणत्या अधिवेशनात संमत झाला ?
       लाहोर (१९३१ )
84. इ.स.१९१६ मध्ये होमरूल लीगची स्थापना कोणी केली ?
      अँनी बेझंट
85. महाराष्ट्रामध्ये होमरूल लीगची स्थापना कोणी केली ?
       लोकमान्य टिळक (बेळगाव येथे १९१७ साली )
86. पंजाबचा सिंह कोणास म्हटले जाते ?
      लाला लजपतराय
87. इ.स.१९२० मध्ये महात्मा गांधीनी कोणती चळवळ  सुरु केली ?
       असहकार चळवळ
88. वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या नावाने ओळखले जाते ?
       आद्य क्रांतिकारक
89. इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली ?
     श्यामजी कृष्ण वर्मा (१९०६ साली लंडन येथे )
90. कर्झन वायलीचा वध कोणी केला ?
       मदनलाल धिंग्रा (१९४० साली )
91. कलेक्टर जॅक्सनचा वध कोणी केला ?
      अनंत कान्हेरे (१९०९ साली )
92. महात्मा गांधींनी १९१८ मध्ये कोणता सत्याग्रह केला ?
      खेडा सत्याग्रह
93. महात्मा गांधींची दांडी यात्रा केव्हा सुरु झाली ?
     १२ मार्च १९३०
94. महात्मा गांधी दांडी येथे केव्हा पोहोचले ?
     ५ एप्रिल १९३०
95. महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह केव्हा केला ?
      ६ एप्रिल १९३०
96. पुणे करार केव्हा झाला ?
      २५ सप्टेंबर १९३२
96. मित्रमेळा संघटनेची स्थापना केव्हा झाली ?
     १ जानेवारी १९०० साली
97.  मित्रमेळा संघटनेची स्थापना कोणी केली ?
      विनायक दामोदर सावरकर
98. मित्रमेळा संघटनेचे रुपांतर कशात झाले ?
       अभिनव भारत या संघटनेत
99. पुणे करार कोणा-कोणात झाला ?
       महात्मा गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यात
100 . देशात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका केव्हा सुरु झाल्या ?
      १९५२ साली
धन्यवाद !
 
 

 

No comments:

Post a Comment