Monday, August 29, 2022

वाक्प्रचार व त्यांचा अर्थ


    


      


      वाक्प्रचार व त्यांचे अर्थ 

 1.डोळे दिपणे - आनंदाने डोळे चमकणे.

 2.जाहीर करणे - सर्वांना सांगणे.

 3. आभार मानणे- कृतज्ञता व्यक्त करणे,            धन्यवाद देणे.

 4. खजील होणे - शरम वाटणे.

 5. आश्चर्यचकित होणे - नवल वाटणे.

 6. मान्य करणे - कबूल करणे.

 7. स्वैर हिंडणे - मोकाट फिरणे.

 8. भक्ष्य मिळवणे - अन्न मिळवणे.

 9. बाचाबाची होणे - शाब्दिक भांडण होणे.

 10. मन मोहून टाकणे - मन गुंतून पडणे.

 11. स्वाधीन करणे - देणे सुपूर्द करणे.

 12. साह्य करणे - मदत करणे.

13. काया झिजवणे -

         दुसऱ्यांच्या भल्यासाठी कष्ट करणे.


 14. गौरव करणे - सन्मान करणे.

 15. भान हरपणे - गुंग होणे.

 16. सौजन्य दाखवणे -

             चांगुलपणा दाखवणे.

 17. आज्ञा पाळणे - आदेश मानणे.

 18. वंदन करणे - नमस्कार करणे.

 19. वेळ खर्च करणे -

            वेळ सत्कारणी लावणे.

 20. पसार होणे - पळून जाणे, निघून जाणे.

 21. रंगून जाणे -

           गुंग होणे, मग्न होणे, गर्क होणे.

 22. पांगापांग होणे - गर्दी विरळ होणे.

 23. भडीमार करणे - जोराचा मारा करणे.

 24. बाजू घेणे - कड घेणे,म्हणणे पटणे.

 25. हुशारी येणे - तरतरी येणे, बरे वाटणे.

 26. तणतणणे - रागाने बडबडत जाणे.

 27. अभिवादन करणे - नमस्कार करणे.

 28. स्वागत करणे -

         चांगल्या प्रकारे या म्हणणे.

 29. मार्ग काढणे - 

           रस्ता काढणे बाहेर पडणे.

 30.  मलूल होणे  - निस्तेज होणे कोमेजणे.

 31. करुणा उत्पन्न होणे - दया उत्पन्न होणे.

 32. अपशब्द वापरणे -

             वाईट शब्द उच्चारणे.

 33. सल्लामसलत करणे -

             विचारविनिमय करणे.

34.  दर्शन घेणे - पाहणे, भेटणे.

 35. हात पाय हलवणे - काम करणे.

 36. ऐट दाखवणे - रुबाब दाखवणे.

 37. शरीर राबवणे - कष्ट करणे.

 38. खांद्याला खांदा लावून काम करणे

    - एकमेकांना सहकार्य करून काम करणे.

 39.अभिमान वाटणे -

       योग्य असा गर्व वाटणे.

 40. निश्चय करणे - ठाम निर्धार करणे.

 41. वसाहत करणे -  वस्ती करणे.

42.धारण करणे - अंगीकारणे.

 43.हौस असणे - आवड असणे.

 44.नाद लागणे -

       आवड निर्माण होणे, छंद जडणे.

 45. हट्ट धरणे -  हेका धरणे.

 कौतूक वाटणे - अप्रूप वाटणे.

 स्फूर्ती मिळणे - प्रेरणा मिळणे.

 



Sunday, August 28, 2022

विमानाचा शोध कसा लागला?


विमानाचा शोध कसा लागला?


आज विमानातून प्रवास करणं अगदी सामान्य गोष्ट झाली आहे. पण, ज्या वेळी विमान ही कल्पना अस्तित्वात नव्हती त्या वेळी आकाशात पक्ष्यांची भरारी बघून हवाई सफर करण्याची कल्पना प्रथम राईट बंधूंनी केली. चार वर्षांच्या अथक परिश्रमानंतर आणि वारंवार अपयश आल्यानंतरही आपले स्वप्न साकार करण्याची जिद्द या स्वप्नाला आकार देऊ शकली. राईट बंधूंनी पृथ्वी ते आकाश यामधील सीमारेषा पुसून टाकण्यासाठी जो संयम ठेवला तो खरोखरच एक आदर्शच म्हणायला हवा. १७ डिसेंबर १९०३ रोजी अमेरिकन वेळेनुसार सकाळी १० वाजून ३५ मिनिटांनी ज्या वेळी राईट बंधूंनी विमान क्षेत्राच्या नव्या उपलब्धीला स्पर्श केला तेव्हा त्यांच्या सोबत डॅनियल नावाचे एक प्रत्यक्षदर्शी उपस्थित होती. याबाबात नंतर डॅनियल यांनी आपल्या आठवणी लिहिताना म्हटले होते की, ऑरविले आणि विल्बर राईट या बंधूंनी आपल्या स्वतःच्याच उपलब्धीकडे आश्चर्याने बघितले होते आणि त्यातून त्यांना मोठे साहस लाभले होते.




 आविष्काराच्या दिवशी हवामान खूप थंड होते. साधारण २७ मैल प्रति तास या वेगाने हवा वाहत होती. तरी पण राईट बंधूंनी तीन प्रयत्न केले. जे संमिश्र समाधान देणारे होते. मात्र चौथा प्रयत्न १०० टक्के यश देणारा होता.


त्यानंतर १७ डिसेंबर हा दिवस विमानाची पहिली भरारी घेणारा दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला. विमानाच्या शोधाच्या दहा वर्षांनंतर ऑलीव्हर यांनी सांगितले, 'आज मी २७ मैल प्रति तास वेगाने वाहणाऱ्या हवेच्या मध्ये एका अजब यंत्रावर त्याच्या सुरक्षिततेबद्दल माहित असूनही पहिल्यांदा भरारी घेण्याच्या बाबत विचार करत शकत आहे. आज एवढ्या वर्षांनंतर ज्या यंत्राबद्दल काही माहीत नव्हते त्यावर स्वार होऊन एवढे साहस करणे मला

आश्चर्यचकित वाटते.' चौथ्यांदा प्रयत्न केल्यानंतर जी भरारी यशस्वी ठरली त्या वेळचे विमान ७०० पौंडाचे होते. त्यासाठी राईट बंधूंनी कॅरोलिनामध्ये एक ट्रॅकही तयार केला होता. राईट बंधूंच्या विमानशोधाची कथा १८८९ पासून सुरू होते. अमेरिकेतील ओहिओ येथे राहणाऱ्या या दोन भावांपैकी राईट यांनी स्मीथ सोनियन इन्स्टिट्यूटला पत्र लिहून आकाशात उडण्याचा प्रयोग करण्याची माहिती मागवली होती. त्यानंतर या बंधूंनी पक्ष्यांच्या आकाशात उडण्याच्या पद्धतीचा सूक्ष्म अभ्यास केला. उंचावर पोहोचल्यानंतर पक्षी कशा प्रकारे आपले पंख मुड़पतात आणि हवेच्या वाहण्याच्या वेगानुसार वळणे, वर जाणे किंवा किंवा खाली येण्यासाठी कशाप्रकारे पंखांचा वापर करतात याचेदेखील त्यांनी खूप निरीक्षण केले. या अभ्यासानंतर राईट बंधूंनी ग्लायडर बनवण्यास सुरुवात केली. १९०० मध्ये राईट बंधूंनी ५० पौंड वजनाचे आणि १७ फूट लांब तर १९०१ मध्ये १०० पौंड वजनी आणि २२ फूट लांब पंखांच्या ग्लायडरचे निरीक्षण आणि परीक्षण सुरू केले. यावर संतुष्ट न झाल्यामुळे त्यांनी २२ फूट लांब पंखांच्या आणखी एक ग्लायडरचा प्रयोग केला. आणखी पुढची दोन वर्षे त्यांची परीक्षणे सतत सुरू होती. २००३ च्या शेवटी त्यांना अखेर विमानाचा शोध लागला आणि विमान भरारी करण्यात ते यशस्वी ठरले.

Tuesday, August 23, 2022

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन


    


  डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

                डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी झाला. ते एक जातिवंत शिक्षक, आदर्शवादी विचारवंत आणि महान तत्त्वज्ञ होते. कृतीशील कर्तृत्वाने त्यांनी संपूर्ण शिक्षकवर्गापुढे अनेक आदर्श ठेवले. त्यामुळे 'शिक्षकांचे शिक्षक' अशीही त्यांची ओळख आहे.

               सन १९६२ मध्ये ते भारताचे राष्ट्रपती झाले. तेव्हापासून त्यांचा जन्मदिन 'शिक्षक दिन' म्हणून साजरा केला जातो. 'शिक्षक हा शिक्षणाचा केंद्रबिंदू आहे', असे त्यांचे ठाम मत होते. शिक्षकाबद्दल म्हणजेच गुरुबद्दल आदरभावना व्यक्त करणे हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे.

शिक्षक आणि शिक्षण हे समाजोद्धाराचे प्रभावी साधन आहे. शिक्षकांनी शिक्षणात चांगल्या परंपरा टिकवून नव्या' चांगल्या परंपरासुद्धा निर्माण केल्या पाहिजेत. शिक्षण हे आत्मोन्नती, व्यक्तीमधील परिपूर्णता आणि उपजीविकेचे साधन आहे. विद्यार्थी-विद्यार्थिनी ज्या

शिक्षणामुळे चारित्र्यवान बनतील तेच खरे शिक्षण ते होय. 'कर्तृत्व, वक्तृत्व, भाषा प्रभूत्व, ज्ञानप्रियता, दी तादात्मता, व्यासंग यापैकी एखादा जरी गुण शिक्षकाजवळ असेल तर तो उत्तम शिक्षक ठरतो', असे ते नेहमी म्हणत. त्यांच्याजवळ हे सर्वच गुण होते अन् म्हणूनच ते आदर्श शिक्षक म्हणून लोकप्रिय झाले.

 'शिक्षकांचे शिक्षण सुंदर असावे आणि त्यात नित्य नाविन्य असावे. कारण शिक्षण हा प्रगतीचा चा पाया आहे, त्यामुळे तो जास्तीत जास्त बळकट A. कसा होईल हे पाहण्याची जबाबदारी शिक्षकांची ना आहे, असे त्यांचे मत होते. विद्यार्थ्यांचा नैतिक व च आत्मिक विकास घडणे गरजेचे असून हे पुण्यकर्म शिक्षकांनीच करायचे असते. 'समस्त विद्यार्थी. वी हे शिक्षकांचे दैवत असून शिक्षकांनी विद्यार्थी घडवण्यासाठी केलेली धडपड ही पूजा असून शिक्षण संस्था हे मंदिर आहे.' या अतिशय सहज ती सोप्या शब्दात त्यांनी शिक्षक व शिक्षणाचे महत्त्व चे वर्णन केले आहे.

न्या दुर्दैवाने अलीकडे काही वर्षांपासून गटबाजी

व राजकारणाची किड शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला लागली आहे. शिक्षण प्रणाली बदलली अन् शिक्षकही बदलले.


'हाडाचे शिक्षक' आज दुर्मीळ होत चाललेत. 'उदरभरणासाठी शिक्षकीपेशा' असेच चित्र आजकाल जवळजवळ दिसून येत आहे. जीवनाविषयीचा एक सुसंस्कारित, विधायक, सामाजिक जाणिवेचा एक विशिष्ठ दृष्टिकोन तयार होणे हे शिक्षणाचे साध्य आहे. मात्र, प्रत्यक्षात प्रचलित शिक्षण प्रणाली आणि शिक्षकवर्ग या साध्यापासून दूरच होत चाललेला

दिसून येत आहे. भारतीय संस्कृतीत शिक्षकाचे स्थान व दर्जा देवासमान आहे.


'हुकूम किंवा सत्ता गाजवणे हे शिक्षकाचे ब्रीद नसून सेवा, सहानुभूती, संस्कार व आदर हे शिक्षकाचे ब्रीद आहे. उच्चारावरून विद्वत्ता, आवाजावरून नम्रता आणि वर्णनावरून शील समजते. काळजीपूर्वक निरीक्षणासारखा दुसरा शिक्षक नाही. आई आणि शिक्षक यांनी दिलेले शिक्षण आणि संस्कारच माणसाचे भवितव्य उज्ज्वल किंवा अंधःकारमय बनवतात. म्हणून शिक्षकांनी आत्मीयतेने शिकवले पाहिजे.' हे डॉ. राधाकृष्णन यांचे शिक्षकाविषयीचे मत होते. सद्यपरिस्थितीत शिक्षणक्षेत्रात नवनवीन अभ्यासक्रम नूतन पद्धतीने सुरू करून त्यांची प्रत्यक्ष कृतीत कार्यवाही करणे नितांत गरजेचे आहे. पर्यावरण संरक्षण संवर्धन, प्रदूषण समस्या निर्मूलन, आपत्कालीन व्यवस्थापन, प्रथमोपचार, ★ उद्योजकता विकास माहिती तंत्रज्ञान या प्रचलित विषयांचे विद्यार्थ्यांना ज्ञान देणे अत्यावश्यक आहे.


१७ एप्रिल १९७५ रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन पंचत्वात विलीन झाले. देशभरात सर्वत्र त्यांच्या स्मृत्यर्थ दरवर्षी ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो, तो साजरा करणे हे एक औपचारिक कर्तव्य आहे. त्यांची आदर्शवादी तत्त्वे, शिक्षक, शिकवणे याबाबतची नीतिमूल्ये पाळली गेली तरच या. शिक्षकदिनाचा सर्वार्थाने गौरव होईल. डॉ. राधाकृष्णन हे एक चालते बोलते विद्यापीठ होते. राजकीय क्षेत्रात सक्रिय राहूनदेखील त्यांन शिक्षणक्षेत्रात कधीच राजकारण केले नाही. या सर्व गोष्टींचा विचार शिक्षण क्षेत्राशी निगडित सर्वांनीच करणे गरजेचे आहे.

Sunday, August 21, 2022

कर्मवीर भाऊराव पाटील






र्मवीर भाऊराव पाटील

                         मानवी समुदायाच्या अथांग सागरात अशी काही नररत्ने असतात की जी आपल्या तेजाने, दैदिप्यमान चारित्र्याने आणि कर्तृत्वाने सतत चमकत असतात व सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. याच शिवरायांच्या पवित्र महाराष्ट्र भूमीत ज्यांनी झोपलेल्याला जागे केले उठलेल्याला उभे केले, उभे असलेल्याला चालायला लावले, चालणाऱ्याला पळायला लावले आणि पळणाऱ्याच्या हाती अज्ञान, अंध:कार नाहीसा करण्यासाठी ज्ञानाची ज्योत दिली. त्या शिक्षणमहर्षी कर्मवीर आण्णांना बिनम्र अभिवादन करून त्यांच्या शैक्षणिक कर्तृत्वाची दिशा मी मांडणार आहे.






"शिक्षण हाच मानवाचा तिसरा डोळा आहे." असे निक्षून सांगणाऱ्या त्यागमूर्ती मानकऱ्याचा जन्म २२ सप्टेंबर १८८७ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला.






                          आण्णांवर गंगामाई या त्यांच्या मातेने त्याग व साधुत्वाचे सुंदर संस्कार कैले. भाऊरावांच्या कार्यक्रमाची सुरूवात मातेस आदराने वंदन करूनच होत असे. बाहेर जाण्याअगोदर विनम्र भावाने वंदन करून ते आपल्या कामास निघत आईच्या आज्ञेचे पालन करून, नतमस्तक होऊन आशीर्वाद मागणारी रत्ने पुढे कर्तृत्वाने अमरत्वास पोहोचल्याची जी काही उदाहरणे आहेत त्यात युगपुरूष शिवछत्रपती, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आधुनिक शिक्षणमहर्षी कर्मवीर आण्णा हे होत. भाऊरावांची मातेवरची निष्ठा अतुट अढळ आणि सात्विक अशीच होती. बाल भाऊराव अत्यंत खेळकर व हूड प्रवृत्तीचे असल्याने त्यांच्या करारी व कर्मठ पित्यांना असे वाटे की, भाऊरावांनी खूप शिकावे, पदवी मिळबाबी. पण आण्णा बालपणात सवंगड्याबरोबर रानोमाळ भटकले. रामलिंग व बाहुबलीचा डोंगर त्यांनी अनेक वेळा पायी तुडविला.


पोहणे, झाडावर चढणे, खेळणे व व्यायाम याची त्यांना आवड होती.

कुस्तीच्या व्यायामामुळे त्यांचे शरीर बलदंड झाले ते तसेच निर्भयी व स्वाभिमानी

बनले.






त्यांच्या बालपणीची एक घटना अंगावर शहारे आणणारी आहे. लहानपणी

नदीत पोहत असताना सुसरीपुढे न घाबरता ते दंड थोपटून उभे राहिले होते..

कारण 'भीती' हा शब्दच त्यांना ठाऊक नव्हता.


जन्मताच निसर्गाने त्यांना दोन गोष्टी दिल्या होत्या-एक म्हणजे धिप्पाड

देहयष्टी व गडगडणारा पहाडी आवाज,

याच आवाजाने अखिल महाराष्ट्रात शिक्षणाचा 'रयतरूपी पहाड' त्यांनी उभा केला.लहानपणीच कुंभोज भागातील सत्याप्पा भोसले नावाच्या बंडखोर

क्रांतिकारकाच्या बेडर स्वभावाचे आण्णांच्या अंतःकरणात बीजारोपण झाले.

सत्याप्पाचे शौर्य व साहस त्यांनी ऐकले होते. सत्याप्पा गरीबांचा

मित्र होता. आपणही दीन-दलित रयतेचे मित्र व्हावे, असे आण्णांना नेहमी

वाटे. कोल्हापूरच्या कोर्टात सत्याप्पाने गावची आठवण म्हणून चपला मागितल्या.

आण्णांनी आपल्या चपला सत्याप्पाला लगेच देऊन टाकल्या. त्या केवळ सत्तूचंडखोरावरील प्रेमामुळेच !






समाजामध्ये समतेची भावना निर्माण करून स्वाबलंबनातून शिक्षणाच्या

मोहिमेस न्यायाची वैचारिक बैठक निर्माण करण्याच्या भूमिकेतून दिनांक ६ आक्टोबर

१९१९ साली काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना वसतिगृहांच्या रूपाने

कार्यान्वित केली.वसतिगृहाबरोबर शाळा, कॉलेजीस, ट्रेनिंग कॉलेजीस सुरू करून शिक्षणाचे

एक महान पर्व आणि ज्योतिराव फुल्यांची इच्छा प्रत्यक्ष कृतीत आणण्याचे

काम कर्मवीरांनी केले.





ज्ञानदेव घोलपासारख्या एका अस्पृश्य विद्यार्थ्यावर झालेला अन्याय कर्मवीरांनी

कोल्हापूर व सातारच्या ज्ञान पाणपोईत घालून दूर केला. हाच ज्ञानदेव घोलप

आण्णांच्या मार्गदर्शनामुळे पुढे अस्पृश्यांचा आदर्श दीपस्तंभ ठरला. १९२४ साली राजर्षि शाहूंच्या नावाने एक निधर्मी वसतिगृह सुरू केले. या वसतिगृहाचे नामकरण

महात्मा गांधींच्या हस्ते केले. उदघाटनसमारंभाच्या वेळी बापूजी एका प्रसंगाने

अचंबित झाले----:






अज्ञानाच्या अंधःकारात मिटल्या मनाने जगणाऱ्या हरिजनांच्या समाजातील

प्रकाशकिरण ठरला असा विद्यार्थी हरीच्या मनावर अवलंबून न राहता कर्मवीरांच्या

या शाहू बोर्डिंगात स्वतःच्या बळाने आणि भाऊरावांच्या प्रेरणेने संस्कृत विषयात

पहिल्या वर्गात पहिला आला. ते ऐकून महात्मा गांधीना महदाश्चर्य वाटले. अत्यंत आनंद झाला या विद्यार्थ्याच्या वर्गात त्याकाळी ९९% विद्यार्थी उच्च वर्णीय

होते. विद्येची कुठलीही परंपरा नसणारा विद्यार्थी देवानी केलेल्या भाषेत अव्वल दर्जाचे यश संपादन करू शकतो, हा 'रयते'चा चमत्कार महात्मा गांधीनी पाहिलाआणि आपल्या गळ्यातील हार त्या विद्यार्थ्यांच्या गळ्यात घातला. परंपरेच्या,सनातन्यांच्या विद्येची मक्तेदारी संपल्याचे प्रतीक म्हणजे तो हार होता. नव्या युगाची प्रासादचिन्हे त्या हारात गुंफली गेली होती. सनातन्यांच्या बालेकिल्यात सिंहाच्या आचाळीतील केस उपटणाऱ्या म.फुले यांची ती विजयध्वजा होती. हे घडविले म्हणून घडले.






कर्मवीरांच्या वसतिगृहात सर्व धर्मीय विद्यार्थी एकत्र राहतात, जेवतात,

ज्ञानाचा लाभ घेतात हे पाहून महात्मा गांधीना आनंद झाला. वसतिगृहांचे थोरपण त्यांनी  जाणले. आणि प्रशंसोद्गार  काढले. या भरतखंडातील हे एकमेव उदाहरणअसल्याचा निर्वाळा गांधीजीनी दिला ते म्हणाले "जे साबरमती आश्रमात मला जमले नाही ते भाऊरावांनी या ठिकाणी करून दाखविले. "






कर्मवीरांचे अस्पृश्यता निर्मुलनाचे व शैक्षणिक कार्य भारताच्या सामाजिक

इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्याइतके गौरवपूर्ण आहे.

'कमवा आणि शिका' Earn and Learn या योजनेचेआण्णांच प्रवर्तक आहेत.

भाऊराव मोठी पदवी मिळवू शकले नाहीत पण भगीरथ प्रयत्नांनी

बहूजन समाजाला 'ज्ञानगंगा' उपलब्ध करून देऊ शकले.






थोर माणसे काळाची गरज म्हणनू जन्माला येतात आणि तेजस्वी

व अलौकिक कार्य करून जातात. कर्मवीरानी शिक्षण प्रसाराचे पवित्र कार्य

महाराष्ट्रात केले. स्वाभिमानी व स्वावलंबी शिक्षण मिळया असा संदेश देणाऱ्या रयत शिक्षण संस्थचे बोधचिन्ह वटवृक्ष

आज लाखो ज्ञानदेव शिक्षण घेत आहेत.

आहे त्या वटवृक्षाच्या छायेत

कवि वि. म. कुलकर्णीच्या शब्दांत

पांखी फुट्या पाखरांसाठी

पवित्र असा वटवृक्ष

जो वस्तीला आला

रोविला

त्याला ताटामधला घास दिला

आडवे उभे गुंफित धागे

उबदार असे घरटे रचले

खांद्यावर घेतली कावड

खाली कधी ठेवली नाही

दिव्यावर लावीत दिवा

गंगाकाठ चालत राहावा".


भाऊरावांचे शैक्षणिक कार्य पाहून एका अमेरिकन शिक्षणतज्ञाने त्यांना

आर्थिक सहाय्य देऊ केले ते पाहून खडीच्या ढीगाकडे बोट दाखवून आण्णा

स्वाभिमानाने म्हणाले,


"These are my heap of dollars."

कर्मवीरांच्या ‘स्वाबलंबन,स्वाभिमान, स्वाध्याय, समता' या चतु:सुत्रीचा देशातील


शिक्षण क्षेत्रापुढे आदर्श आहे. आज रयतेच्या मुलांचे शिक्षणाचे कार्य करणारी

संस्था केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील एक अग्रेसर संस्था आहे.


सध्या या संस्थेमार्फत ३५ महाविद्यालये, ३२६ माध्यामिक शाळा,

८ अध्यापन महाविद्यालये, ११ प्राथमिक शाळा, ८३ वसतिगृहे व सुमारे ५०

इतर शाखा चालविल्या जात आहेत.


या संस्थेत सुमारे ३ लाख विद्यार्थी शिकत असून ८८-८९ चे

वार्षिक बजेट ४१ कोटी ५७ लाख रुपयांचे आहे.


रयत शिक्षण संस्था हे जणू श्रीकृष्णाने अर्जुनाला दाखविलेले विश्वरूप

दर्शन आहे. त्यागमूर्ति कर्मवीर हे अमृतपानाचे मानकरी आहेत की ज्यांना सारा

महाराष्ट्र वंदन करतो.  त्यांच्या अलौकिक कार्यामुळे जनता प्रेमाने त्यांना 'कर्मवीर' म्हणून

लागली. भारत सरकारने 'पद्मभूषण' हा किताब देऊन गौरव केला तर पुणे

विद्यापीठाने 'डॉक्टर ऑफ लिटरेचर' ही पदवी देऊन सन्मान केला.

आचार्य विनोबा भावे आण्णांच्याबद्दल एकदा म्हणाले होते


"भाऊरावांचे कार्य सतत प्रकाश देणाऱ्या नंदादीपाप्रमाणे आहे."


डोक्याला शिरस्त्राण नाही, पायात पादत्राण नाही पण पहाडी देहात

युगायुगांचे ध्येयवादी त्राण ओसंडून वाहत आहे. अशा अवस्थेत आण्णांनी शिक्षण

प्रसारासाठी महाराष्ट्रभर वणवण केली..


ज्ञानगंगेच्या तळाशी शेवाळ्यात अस्पष्ट झालेली, अंध:काराच्या थराथरातून

खोलवर रुजलेली रत्ने वर आणून सोडणारा आणि सतत आयुष्यभर संघर्ष करून

दीन-दलितांच्या आयुष्यातील अंधार वादळ वाऱ्याबरोबर झगडत नाहीसा करणारा

हा दीप ९ मे १९५९ रोजी अनंतात विलीन झाला. परंतु हजारों ज्ञानदीप

चेतवून, पेटवून गेला.


सातारच्या अजिंक्य ताऱ्याच्या पायथ्याशी डोंगर उतरणीवर कर्मवीरांची

समाधी आहे व तेथेच पुतळाही आहे तो आण्णांचा भव्य पुतळा आपल्या

सर्वांना निरंतर स्फूर्ती देत राहील यात शंका नाही या समाधीबद्दल कवी शिलेदार

म्हणतात


या चार भिंतीवर विलसे दिव्य समाधी,

हा रयतपुरीचा राजघाटहो त्यागी,

ही मूर्ति देवो

स्फूर्ति सतत विरागी,

स्वर्गस्थ सुरांची

पुष्पवृष्टी दिनरात

तो अमर जाहला

कर्मवीर जगतात'.


धन्यवाद !

शिक्षक दिन मराठी भाषण



5 सप्टेंबर - शिक्षक दिन मराठी भाषण 


प्राचीन कालखंडापासून आपल्या देशामध्ये गुरुपरंपरेला फार महत्व आहे. पूर्वी या देशामध्ये गुरूच्या कुलात जाऊन विद्यार्थी ज्ञानाचे धडे घेत होते. त्या पद्धतीला गुरुकुल शिक्षण पद्धती असे आपण पाहतो. आज या देशामध्ये मुले शाळेत जाऊन शिकू लागली. पूर्वी शिक्षण हे वनामध्ये दिले जायचे. आज शिक्षण हे शाळेमध्ये दिले जाते... विद्यार्थ्याची जडणघडणीत त्याच्या गुरुजनांचे योगदान महत्त्वाचे असते. आपल्या देशामध्ये त्याच गुरुजनांचा सन्माननीय शिक्षकांचा यथोचित सन्मान व्हावा, त्यांच्या कार्याचा आढावा, मागोवा लोकांनी घ्यावा याचसाठी शिक्षक दिन हा साजरा केला जातो. भारतामध्ये स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये ५ सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिन, शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.


एक सामान्य माणूस, उत्तम शिक्षक ते उत्तम प्रशासक या देशाचे राष्ट्रपती हा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा प्रवास सर्वांच्या समोर आदर्श प्रेरणादायी पहावयास मिळतो. आज शिक्षक दिन साजरा करत असताना आपण आपल्याला ज्ञानाचे, जीवनाचे, आयुष्याचे, कला, क्रीडा, साहित्य यासारख्या क्षेत्रामध्ये आपणास घडवणाऱ्या गुरुवर्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा करत असतो. शिक्षक तन, मन, धन, अर्पण आणि समर्पित करून एक पिढी घडविण्याचे पवित्र कार्य करत असतात. या देशामध्ये शिक्षण हे पूर्वी विशिष्ट लोकांची मक्तेदारी होती, पण हे शिक्षण आज सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचले. या शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षक हे आपणास आपलं आयुष्य संस्कारमय, शिस्तबद्ध परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतं. याचाच आदर्श आपण घेतला पाहिजे.


शिक्षक हा समाजाचा आरसा असतो. अज्ञांनी मुलाला ज्ञानी बनवतो. विद्यार्थ्यातील दुर्गुण बाजूला काढून त्याच्या सद्गुणांना वाव देतो. उत्तम खेळाडू, उत्तम प्रशिक्षक, उत्तम वक्ता, उत्तम वैज्ञानिक घडविण्यासाठी शिक्षक हे अविरतपणे प्रयत्न करत असतात. समाजाला अशा शिक्षकांची गरज असते. आज देशभरात जगभरात शिक्षकांच्याकडे पाहिले तर हे शिक्षक विद्यार्थ्यांच्यावरती चांगले संस्कार करत असतात. शिक्षकांना सर्वात जास्त आनंद केव्हा मिळत असतो. आपला एखादा

विद्यार्थी सामान्य असेल, पण तो जेव्हा त्यांच्या हाताखाली घडतो व उत्तम व्यक्ती म्हणून । ज्यावेळी समाजात वावरत असतो. त्यावेळी शिक्षकांना आनंद होत असतो. आज शिक्षकांनी आपल्यासमोर वेगवेगळ्या क्षेत्रातील आदर्श ठेवण्याचे कार्य करतात. व्यक्ती मनुष्य आणि विद्यार्थी समाज या सर्व गुणांचा अभ्यास करून शिक्षक एक विचारांची चौकट आपल्यासमोर निर्माण करतात यातून आपण गुरुजनांच्या विचारांचा आदर्श घेतला तर एक नवा समाज, नवी पिढी निर्माण होऊ शकते.


शिक्षण हे प्रत्येक क्षणाला आपल्याला नवीन काहीतरी शिकवण्याचे कार्य करते. तर शिक्षक आपल्याला कृतिशील व्यक्ती बनवण्याचे कार्य करतात. शिक्षक दिनाच्या माध्यमातून या देशामधील करोडो शिक्षकांच्या विचारांनुसार आपण जर आपली योग्य पद्धतीने वाटचाल केली तर एक संस्कारमय, संस्कृतीरक्षक, वैज्ञानिक दृष्टिकोण असणारा विद्यार्थी समाजातून निर्माण होऊ शकतो.


शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी गुरुजींच्या वाणीतून व कृतीतून येणाऱ्या गोष्टींचा संग्रह करून आपण वाटचाल केली तर यशाचा आनंदसुद्धा आपल्याला घेता येऊ शकतो. यासाठीच शिक्षक दिनाच्या निमित्ताने प्रामाणिकपणे पिढी घडविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या गुरुजींच्या विचारांचा आदर्श घेतला पाहिजे.




Saturday, August 20, 2022

जा एकटा पुढे तू

     



        




 

 जा एकटा पुढे तू

 (मराठी अनुवाद )


...... जा एकटा पुढे तू

कोणी जरी न साथी

ना घेतला कुणीही,

संस्नेह हात हाती.

नाही दिली जिवाची,

कोणी जिवास साद

घुमवीत जा तरी तू,

अपुलेच आर्त नाद.

हा मार्ग कंटकांचा,

रक्ताळ पाय झाले

सारे सखे जिवाचे,

मागेच ते गळाले

अंधार हा सभोती,

ही बंद सर्व दारे

घे ध्येयदीप हाती,

जाई पुढेच जा रे.....

- रवींद्रनाथ टागोर


Friday, August 19, 2022

प्रसिद्ध व्यक्ती व त्यांचे उदगार

 









                                     

ll      काही प्रसिद्ध व्यक्तींचे उद्गार ll 

 

             माझे खरे मोठेपण मी मारलेल्या चाळीस लढायांत नसून मी तयार केलेल्या कायदा संहितेत आहे.

                       - नेपोलियन 

रुसो जन्मला नसता तर फ्रेंच राज्यक्रांती घडून आली नसती.

            - नेपोलियन







तुम्हांस जर एक वर्षाची बेगमी करावयाची असेल तर धान्य पेरा ; शंभर वर्षाची बेगमी करावयाची असेल तर माणसे पेरा .- कर्मवीर भाऊराव पाटील 


करा किंवा मरा.( Do or Die .)- महात्मा गांधी .


स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच!

                        - लोकमान्य टिळक 

लोकसंख्यावाढ हा राष्ट्राच्या प्रगतीतील फार मोठा अडसर आहे.

   - रं.धो.कर्वे








जय जवान जय किसान .- लालबहादूर शास्त्री 

सत्य आणि अहिंसा हाच माझा परमेश्वर . - महात्मा गांधी 

लेखण्या सोडा व बंदुका हातात घ्या. - वि.दा.सावरकर 

"तुम मुझे खून दो; मै तुम्हें आझादी दूँँगा l - नेताजी सुभाषचंद्र बोस






माझ्या रक्ताचा एक थेंब देशाचे स्वातंत्र्य आणि एकता यांचे रक्षण करील.- इंदिरा गांधी.

हिंदुत्व हि जितकी स्पृश्यांची मालमत्ता आहे,तितकीच ती अस्पृश्यांची आहे.

- डॉ.बाबासाहेब आंबेडकर 

मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मारणार नाही!

    - डॉ.बाबासाहेब आंबेडकर 

वेदांकडे परत चला . स्वामी दयानंद सरस्वती 

घटनेतील मार्गदर्शक तत्वांचे पूर्णतः अनुपालन झाले तर भारत हा पृथ्वीवरील स्वर्ग होईल.

-    न्या.एम. सी.छगला






सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे! - लोकमान्य टिळक 

पन्नास वर्षे !  ब्रिटिश राज्य तोवर टिकेल ना? स्वा. सावरकर

चलो दिल्ली! -सुभाषचंद्र बोस

चळवळ करा, चळवळ करा, अखंड चळवळ करा.

     -दादाभाई नौरोजी







असे महापुरुष मरत नसतात, त्यांच्या कार्याच्या रूपाने ते अमर झालेले असतात.-महात्मा गांधी(टिळकांबद्दल हे उदगार काढले )


लोकमान्य टिळकांइतकीच शिक्षा मिळण्याचा मान मला मिळाला हा मी माझा बहुमान समजतो.

-महात्मा गांधी


मी भाकरी मागायला आलो आणि माझ्या पदरात दगड टाकले.  महात्मा गांधी







 भारत मुक्त झाला की मानवता मुक्त झालीच. - नेताजी सुभाषचंद्र बोस


 जिच्या हाती पाळण्याची दोरी,ती जगाते उद्धारी.  महात्मा फुले


 विद्येविना मती गेली l

 मती विना नीती गेली l

 नीतीविना गती गेली l

 गतीविना वित्त गेले l

वित्ताविना शूद्र खचले l

इतके अनर्थ एका अविद्येने केले l

( शेतकऱ्यांचा आसूड)


 शिका, संघटित व्हा,संघर्ष करा.

-डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर


 देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढले पाहिजे.

      -डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर








 इष्ट असेल ते बोलणार व शक्य असेल ते करणार.- गोपाळ गणेश आगरकर


 भित्रे लोक त्यांच्या मरणापूर्वीच अनेक वेळा मारतात.

                   - शेक्सपियर

 जय जवान जय किसान जय विज्ञान.                       -अटल बिहारी वाजपेयी