Sunday, August 21, 2022

कर्मवीर भाऊराव पाटील






र्मवीर भाऊराव पाटील

                         मानवी समुदायाच्या अथांग सागरात अशी काही नररत्ने असतात की जी आपल्या तेजाने, दैदिप्यमान चारित्र्याने आणि कर्तृत्वाने सतत चमकत असतात व सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. याच शिवरायांच्या पवित्र महाराष्ट्र भूमीत ज्यांनी झोपलेल्याला जागे केले उठलेल्याला उभे केले, उभे असलेल्याला चालायला लावले, चालणाऱ्याला पळायला लावले आणि पळणाऱ्याच्या हाती अज्ञान, अंध:कार नाहीसा करण्यासाठी ज्ञानाची ज्योत दिली. त्या शिक्षणमहर्षी कर्मवीर आण्णांना बिनम्र अभिवादन करून त्यांच्या शैक्षणिक कर्तृत्वाची दिशा मी मांडणार आहे.






"शिक्षण हाच मानवाचा तिसरा डोळा आहे." असे निक्षून सांगणाऱ्या त्यागमूर्ती मानकऱ्याचा जन्म २२ सप्टेंबर १८८७ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला.






                          आण्णांवर गंगामाई या त्यांच्या मातेने त्याग व साधुत्वाचे सुंदर संस्कार कैले. भाऊरावांच्या कार्यक्रमाची सुरूवात मातेस आदराने वंदन करूनच होत असे. बाहेर जाण्याअगोदर विनम्र भावाने वंदन करून ते आपल्या कामास निघत आईच्या आज्ञेचे पालन करून, नतमस्तक होऊन आशीर्वाद मागणारी रत्ने पुढे कर्तृत्वाने अमरत्वास पोहोचल्याची जी काही उदाहरणे आहेत त्यात युगपुरूष शिवछत्रपती, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आधुनिक शिक्षणमहर्षी कर्मवीर आण्णा हे होत. भाऊरावांची मातेवरची निष्ठा अतुट अढळ आणि सात्विक अशीच होती. बाल भाऊराव अत्यंत खेळकर व हूड प्रवृत्तीचे असल्याने त्यांच्या करारी व कर्मठ पित्यांना असे वाटे की, भाऊरावांनी खूप शिकावे, पदवी मिळबाबी. पण आण्णा बालपणात सवंगड्याबरोबर रानोमाळ भटकले. रामलिंग व बाहुबलीचा डोंगर त्यांनी अनेक वेळा पायी तुडविला.


पोहणे, झाडावर चढणे, खेळणे व व्यायाम याची त्यांना आवड होती.

कुस्तीच्या व्यायामामुळे त्यांचे शरीर बलदंड झाले ते तसेच निर्भयी व स्वाभिमानी

बनले.






त्यांच्या बालपणीची एक घटना अंगावर शहारे आणणारी आहे. लहानपणी

नदीत पोहत असताना सुसरीपुढे न घाबरता ते दंड थोपटून उभे राहिले होते..

कारण 'भीती' हा शब्दच त्यांना ठाऊक नव्हता.


जन्मताच निसर्गाने त्यांना दोन गोष्टी दिल्या होत्या-एक म्हणजे धिप्पाड

देहयष्टी व गडगडणारा पहाडी आवाज,

याच आवाजाने अखिल महाराष्ट्रात शिक्षणाचा 'रयतरूपी पहाड' त्यांनी उभा केला.लहानपणीच कुंभोज भागातील सत्याप्पा भोसले नावाच्या बंडखोर

क्रांतिकारकाच्या बेडर स्वभावाचे आण्णांच्या अंतःकरणात बीजारोपण झाले.

सत्याप्पाचे शौर्य व साहस त्यांनी ऐकले होते. सत्याप्पा गरीबांचा

मित्र होता. आपणही दीन-दलित रयतेचे मित्र व्हावे, असे आण्णांना नेहमी

वाटे. कोल्हापूरच्या कोर्टात सत्याप्पाने गावची आठवण म्हणून चपला मागितल्या.

आण्णांनी आपल्या चपला सत्याप्पाला लगेच देऊन टाकल्या. त्या केवळ सत्तूचंडखोरावरील प्रेमामुळेच !






समाजामध्ये समतेची भावना निर्माण करून स्वाबलंबनातून शिक्षणाच्या

मोहिमेस न्यायाची वैचारिक बैठक निर्माण करण्याच्या भूमिकेतून दिनांक ६ आक्टोबर

१९१९ साली काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना वसतिगृहांच्या रूपाने

कार्यान्वित केली.वसतिगृहाबरोबर शाळा, कॉलेजीस, ट्रेनिंग कॉलेजीस सुरू करून शिक्षणाचे

एक महान पर्व आणि ज्योतिराव फुल्यांची इच्छा प्रत्यक्ष कृतीत आणण्याचे

काम कर्मवीरांनी केले.





ज्ञानदेव घोलपासारख्या एका अस्पृश्य विद्यार्थ्यावर झालेला अन्याय कर्मवीरांनी

कोल्हापूर व सातारच्या ज्ञान पाणपोईत घालून दूर केला. हाच ज्ञानदेव घोलप

आण्णांच्या मार्गदर्शनामुळे पुढे अस्पृश्यांचा आदर्श दीपस्तंभ ठरला. १९२४ साली राजर्षि शाहूंच्या नावाने एक निधर्मी वसतिगृह सुरू केले. या वसतिगृहाचे नामकरण

महात्मा गांधींच्या हस्ते केले. उदघाटनसमारंभाच्या वेळी बापूजी एका प्रसंगाने

अचंबित झाले----:






अज्ञानाच्या अंधःकारात मिटल्या मनाने जगणाऱ्या हरिजनांच्या समाजातील

प्रकाशकिरण ठरला असा विद्यार्थी हरीच्या मनावर अवलंबून न राहता कर्मवीरांच्या

या शाहू बोर्डिंगात स्वतःच्या बळाने आणि भाऊरावांच्या प्रेरणेने संस्कृत विषयात

पहिल्या वर्गात पहिला आला. ते ऐकून महात्मा गांधीना महदाश्चर्य वाटले. अत्यंत आनंद झाला या विद्यार्थ्याच्या वर्गात त्याकाळी ९९% विद्यार्थी उच्च वर्णीय

होते. विद्येची कुठलीही परंपरा नसणारा विद्यार्थी देवानी केलेल्या भाषेत अव्वल दर्जाचे यश संपादन करू शकतो, हा 'रयते'चा चमत्कार महात्मा गांधीनी पाहिलाआणि आपल्या गळ्यातील हार त्या विद्यार्थ्यांच्या गळ्यात घातला. परंपरेच्या,सनातन्यांच्या विद्येची मक्तेदारी संपल्याचे प्रतीक म्हणजे तो हार होता. नव्या युगाची प्रासादचिन्हे त्या हारात गुंफली गेली होती. सनातन्यांच्या बालेकिल्यात सिंहाच्या आचाळीतील केस उपटणाऱ्या म.फुले यांची ती विजयध्वजा होती. हे घडविले म्हणून घडले.






कर्मवीरांच्या वसतिगृहात सर्व धर्मीय विद्यार्थी एकत्र राहतात, जेवतात,

ज्ञानाचा लाभ घेतात हे पाहून महात्मा गांधीना आनंद झाला. वसतिगृहांचे थोरपण त्यांनी  जाणले. आणि प्रशंसोद्गार  काढले. या भरतखंडातील हे एकमेव उदाहरणअसल्याचा निर्वाळा गांधीजीनी दिला ते म्हणाले "जे साबरमती आश्रमात मला जमले नाही ते भाऊरावांनी या ठिकाणी करून दाखविले. "






कर्मवीरांचे अस्पृश्यता निर्मुलनाचे व शैक्षणिक कार्य भारताच्या सामाजिक

इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्याइतके गौरवपूर्ण आहे.

'कमवा आणि शिका' Earn and Learn या योजनेचेआण्णांच प्रवर्तक आहेत.

भाऊराव मोठी पदवी मिळवू शकले नाहीत पण भगीरथ प्रयत्नांनी

बहूजन समाजाला 'ज्ञानगंगा' उपलब्ध करून देऊ शकले.






थोर माणसे काळाची गरज म्हणनू जन्माला येतात आणि तेजस्वी

व अलौकिक कार्य करून जातात. कर्मवीरानी शिक्षण प्रसाराचे पवित्र कार्य

महाराष्ट्रात केले. स्वाभिमानी व स्वावलंबी शिक्षण मिळया असा संदेश देणाऱ्या रयत शिक्षण संस्थचे बोधचिन्ह वटवृक्ष

आज लाखो ज्ञानदेव शिक्षण घेत आहेत.

आहे त्या वटवृक्षाच्या छायेत

कवि वि. म. कुलकर्णीच्या शब्दांत

पांखी फुट्या पाखरांसाठी

पवित्र असा वटवृक्ष

जो वस्तीला आला

रोविला

त्याला ताटामधला घास दिला

आडवे उभे गुंफित धागे

उबदार असे घरटे रचले

खांद्यावर घेतली कावड

खाली कधी ठेवली नाही

दिव्यावर लावीत दिवा

गंगाकाठ चालत राहावा".


भाऊरावांचे शैक्षणिक कार्य पाहून एका अमेरिकन शिक्षणतज्ञाने त्यांना

आर्थिक सहाय्य देऊ केले ते पाहून खडीच्या ढीगाकडे बोट दाखवून आण्णा

स्वाभिमानाने म्हणाले,


"These are my heap of dollars."

कर्मवीरांच्या ‘स्वाबलंबन,स्वाभिमान, स्वाध्याय, समता' या चतु:सुत्रीचा देशातील


शिक्षण क्षेत्रापुढे आदर्श आहे. आज रयतेच्या मुलांचे शिक्षणाचे कार्य करणारी

संस्था केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील एक अग्रेसर संस्था आहे.


सध्या या संस्थेमार्फत ३५ महाविद्यालये, ३२६ माध्यामिक शाळा,

८ अध्यापन महाविद्यालये, ११ प्राथमिक शाळा, ८३ वसतिगृहे व सुमारे ५०

इतर शाखा चालविल्या जात आहेत.


या संस्थेत सुमारे ३ लाख विद्यार्थी शिकत असून ८८-८९ चे

वार्षिक बजेट ४१ कोटी ५७ लाख रुपयांचे आहे.


रयत शिक्षण संस्था हे जणू श्रीकृष्णाने अर्जुनाला दाखविलेले विश्वरूप

दर्शन आहे. त्यागमूर्ति कर्मवीर हे अमृतपानाचे मानकरी आहेत की ज्यांना सारा

महाराष्ट्र वंदन करतो.  त्यांच्या अलौकिक कार्यामुळे जनता प्रेमाने त्यांना 'कर्मवीर' म्हणून

लागली. भारत सरकारने 'पद्मभूषण' हा किताब देऊन गौरव केला तर पुणे

विद्यापीठाने 'डॉक्टर ऑफ लिटरेचर' ही पदवी देऊन सन्मान केला.

आचार्य विनोबा भावे आण्णांच्याबद्दल एकदा म्हणाले होते


"भाऊरावांचे कार्य सतत प्रकाश देणाऱ्या नंदादीपाप्रमाणे आहे."


डोक्याला शिरस्त्राण नाही, पायात पादत्राण नाही पण पहाडी देहात

युगायुगांचे ध्येयवादी त्राण ओसंडून वाहत आहे. अशा अवस्थेत आण्णांनी शिक्षण

प्रसारासाठी महाराष्ट्रभर वणवण केली..


ज्ञानगंगेच्या तळाशी शेवाळ्यात अस्पष्ट झालेली, अंध:काराच्या थराथरातून

खोलवर रुजलेली रत्ने वर आणून सोडणारा आणि सतत आयुष्यभर संघर्ष करून

दीन-दलितांच्या आयुष्यातील अंधार वादळ वाऱ्याबरोबर झगडत नाहीसा करणारा

हा दीप ९ मे १९५९ रोजी अनंतात विलीन झाला. परंतु हजारों ज्ञानदीप

चेतवून, पेटवून गेला.


सातारच्या अजिंक्य ताऱ्याच्या पायथ्याशी डोंगर उतरणीवर कर्मवीरांची

समाधी आहे व तेथेच पुतळाही आहे तो आण्णांचा भव्य पुतळा आपल्या

सर्वांना निरंतर स्फूर्ती देत राहील यात शंका नाही या समाधीबद्दल कवी शिलेदार

म्हणतात


या चार भिंतीवर विलसे दिव्य समाधी,

हा रयतपुरीचा राजघाटहो त्यागी,

ही मूर्ति देवो

स्फूर्ति सतत विरागी,

स्वर्गस्थ सुरांची

पुष्पवृष्टी दिनरात

तो अमर जाहला

कर्मवीर जगतात'.


धन्यवाद !

No comments:

Post a Comment