Tuesday, August 23, 2022

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन


    


  डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

                डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी झाला. ते एक जातिवंत शिक्षक, आदर्शवादी विचारवंत आणि महान तत्त्वज्ञ होते. कृतीशील कर्तृत्वाने त्यांनी संपूर्ण शिक्षकवर्गापुढे अनेक आदर्श ठेवले. त्यामुळे 'शिक्षकांचे शिक्षक' अशीही त्यांची ओळख आहे.

               सन १९६२ मध्ये ते भारताचे राष्ट्रपती झाले. तेव्हापासून त्यांचा जन्मदिन 'शिक्षक दिन' म्हणून साजरा केला जातो. 'शिक्षक हा शिक्षणाचा केंद्रबिंदू आहे', असे त्यांचे ठाम मत होते. शिक्षकाबद्दल म्हणजेच गुरुबद्दल आदरभावना व्यक्त करणे हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे.

शिक्षक आणि शिक्षण हे समाजोद्धाराचे प्रभावी साधन आहे. शिक्षकांनी शिक्षणात चांगल्या परंपरा टिकवून नव्या' चांगल्या परंपरासुद्धा निर्माण केल्या पाहिजेत. शिक्षण हे आत्मोन्नती, व्यक्तीमधील परिपूर्णता आणि उपजीविकेचे साधन आहे. विद्यार्थी-विद्यार्थिनी ज्या

शिक्षणामुळे चारित्र्यवान बनतील तेच खरे शिक्षण ते होय. 'कर्तृत्व, वक्तृत्व, भाषा प्रभूत्व, ज्ञानप्रियता, दी तादात्मता, व्यासंग यापैकी एखादा जरी गुण शिक्षकाजवळ असेल तर तो उत्तम शिक्षक ठरतो', असे ते नेहमी म्हणत. त्यांच्याजवळ हे सर्वच गुण होते अन् म्हणूनच ते आदर्श शिक्षक म्हणून लोकप्रिय झाले.

 'शिक्षकांचे शिक्षण सुंदर असावे आणि त्यात नित्य नाविन्य असावे. कारण शिक्षण हा प्रगतीचा चा पाया आहे, त्यामुळे तो जास्तीत जास्त बळकट A. कसा होईल हे पाहण्याची जबाबदारी शिक्षकांची ना आहे, असे त्यांचे मत होते. विद्यार्थ्यांचा नैतिक व च आत्मिक विकास घडणे गरजेचे असून हे पुण्यकर्म शिक्षकांनीच करायचे असते. 'समस्त विद्यार्थी. वी हे शिक्षकांचे दैवत असून शिक्षकांनी विद्यार्थी घडवण्यासाठी केलेली धडपड ही पूजा असून शिक्षण संस्था हे मंदिर आहे.' या अतिशय सहज ती सोप्या शब्दात त्यांनी शिक्षक व शिक्षणाचे महत्त्व चे वर्णन केले आहे.

न्या दुर्दैवाने अलीकडे काही वर्षांपासून गटबाजी

व राजकारणाची किड शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला लागली आहे. शिक्षण प्रणाली बदलली अन् शिक्षकही बदलले.


'हाडाचे शिक्षक' आज दुर्मीळ होत चाललेत. 'उदरभरणासाठी शिक्षकीपेशा' असेच चित्र आजकाल जवळजवळ दिसून येत आहे. जीवनाविषयीचा एक सुसंस्कारित, विधायक, सामाजिक जाणिवेचा एक विशिष्ठ दृष्टिकोन तयार होणे हे शिक्षणाचे साध्य आहे. मात्र, प्रत्यक्षात प्रचलित शिक्षण प्रणाली आणि शिक्षकवर्ग या साध्यापासून दूरच होत चाललेला

दिसून येत आहे. भारतीय संस्कृतीत शिक्षकाचे स्थान व दर्जा देवासमान आहे.


'हुकूम किंवा सत्ता गाजवणे हे शिक्षकाचे ब्रीद नसून सेवा, सहानुभूती, संस्कार व आदर हे शिक्षकाचे ब्रीद आहे. उच्चारावरून विद्वत्ता, आवाजावरून नम्रता आणि वर्णनावरून शील समजते. काळजीपूर्वक निरीक्षणासारखा दुसरा शिक्षक नाही. आई आणि शिक्षक यांनी दिलेले शिक्षण आणि संस्कारच माणसाचे भवितव्य उज्ज्वल किंवा अंधःकारमय बनवतात. म्हणून शिक्षकांनी आत्मीयतेने शिकवले पाहिजे.' हे डॉ. राधाकृष्णन यांचे शिक्षकाविषयीचे मत होते. सद्यपरिस्थितीत शिक्षणक्षेत्रात नवनवीन अभ्यासक्रम नूतन पद्धतीने सुरू करून त्यांची प्रत्यक्ष कृतीत कार्यवाही करणे नितांत गरजेचे आहे. पर्यावरण संरक्षण संवर्धन, प्रदूषण समस्या निर्मूलन, आपत्कालीन व्यवस्थापन, प्रथमोपचार, ★ उद्योजकता विकास माहिती तंत्रज्ञान या प्रचलित विषयांचे विद्यार्थ्यांना ज्ञान देणे अत्यावश्यक आहे.


१७ एप्रिल १९७५ रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन पंचत्वात विलीन झाले. देशभरात सर्वत्र त्यांच्या स्मृत्यर्थ दरवर्षी ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो, तो साजरा करणे हे एक औपचारिक कर्तव्य आहे. त्यांची आदर्शवादी तत्त्वे, शिक्षक, शिकवणे याबाबतची नीतिमूल्ये पाळली गेली तरच या. शिक्षकदिनाचा सर्वार्थाने गौरव होईल. डॉ. राधाकृष्णन हे एक चालते बोलते विद्यापीठ होते. राजकीय क्षेत्रात सक्रिय राहूनदेखील त्यांन शिक्षणक्षेत्रात कधीच राजकारण केले नाही. या सर्व गोष्टींचा विचार शिक्षण क्षेत्राशी निगडित सर्वांनीच करणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment