Wednesday, September 28, 2022

शहीद भगतसिंग Shahid Bhagatsingh



                                     




                               



अध्यक्ष महाशय, गुरुजनवर्ग उपस्थित प्रेक्षक आणि मित्रानो, प्रथम मायभूमीला परकीय सत्तेच्या कचाट्यातून मुक्त करण्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या, या भूमीवर रक्ताचा अभिषेक करून तिला पारतंत्र्यातून मुक्त करणाऱ्या त्या शूरवीर क्रांतिकारकांना प्रथम वंदन करतो. आज मी अशाच एका क्रांतिकारकाविषयी बोलणार आहे. 'भारतीय क्रांतिकारकांचे मेरूमणी' अशा शब्दात ज्यांचा गौरव केला जातो, त्या थोर क्रांतिकारकाचे नाव आहे पंजाबचे क्रांतिसिंह शहीद भगतसिंग.

   

१९२८ मध्ये भारताला काही सुधार देण्याच्या उद्देशाने ब्रिटिश सरकारने सायमन कमिशन भारतात पाठवले; पण या कमिशनचे सातही सदस्य इंग्रज होते. इंग्रजांना भारतीय जनतेच्या समस्या काय माहीत? भारतीय नेत्यांपैकी एकालाही त्यात न घेतल्याबद्दल सायमन कमिशनला भारतातून विरोध झाला, सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्यासाठी सर्व नेते सज्ज झाले.


लाहोर शहरात याविरुद्ध निदर्शने करण्यात आली. या मोचार्च नेतृत्त्व होते लाला लजपतराय या वयोवृद्ध नेत्याकडे. सर्वांचे आवडते नेते मोठ्या हिमतीने इंग्रजांचा निषेध करत होते; पण उर्मट इंग्रजांनी हे आंदोलन चिरडून टाकत लाठीहल्ला सुरू केला. यात लालाजी जखमी झाले. पुढे त्यातच त्यांचा अंत झाला.


क्रांतिकारकांची माथी भडकली. इंग्रजाविरुद्ध क्रांतिज्योत पुन्हा भडकली. 

संबंध भारत देशात हाहाकार माजला होता. इंग्रजांच्या मनमानी वागण्याला भारतीय जनता त्रासली होती. अन्याय, अत्याचाराने जनता भयभीत झाली होती. इंग्रजांच्या जुलूम शाहीचा आता अहिंसेच्या नव्हे, तर सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने नायनाट करायला हवा, असा ठाम निर्णय घेण्याची वेळ आली होती. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच भगतसिंगांनी आपल्या मित्रांच्या सहकार्याने 'नौजवान भारत सभा' स्थापन केली.अनेक मित्रांना स्वातंत्र्यांचे महत्त्व पटवून देत या नौजवान संघटनेत सामील करून घेतले. त्यांच्या संघटनेच्या 'इन्किलाब जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद' या घोषणेने आसंमत हादरून जायचा. क्रांतीची ठिणगी पडू लागली होती. भारतीय मने स्वातंत्र्याच्या वेडाने झपाटली. जीवाचे रान करून प्राण तळहातावर घेऊन जुलमी इंग्रजांविरुद्ध उघडपणे सशस्त्र क्रांती करण्यास तयार झाली होती.


   लाला लजपतराय यांच्या खुनाचा बदला घ्यायचा, अशा निश्चय भगतसिंगांनी केला. भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, राजगुरू यांनी एक योजना आखून ज्या इंग्रज अधिकाऱ्याने लाठीहल्ला करवून लालाजींचा खून केला, त्या इंग्रज अधिकाऱ्याचा शेवट करायचा निर्णय घेतला आणि ठरलेल्या योजनेप्रमाणे १७ डिसेंबर, १९२८ रोजी पिस्तुलाचा ठो ठो आवाज झाला आणि मोटारीतून चाललेल्या सँडर्स या इंग्रजी अधिकाऱ्याचा नायनाट झाला. ब्रिटिश सरकार हादरले. पळून गेलेल्या मारेकऱ्यांना म्हणजेच भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर यांचा शोध सुरू झाला. क्रांतिकारक वेषांतर करून राहू लागले.


८ एप्रिल, १९२९ रोजी दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये 'पब्लिक 'सेफ्टी' बिलावर चर्चा चालू होती. ही बिले म्हणजे कामगारवर्ग आणि सामान्य जनता यांच्यावर मर्यादा घालणारी होती. क्रांतिकारकांना हे पटले नाही. भगतसिंग यांनी या गोष्टीचा निषेध करायचा निर्णय घेतला; पण तो क्रांतीच्या मार्गाने.


भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी सभागृहात प्रवेश करून बॉम्बस्फोट घडवून आणला व स्वतः पोलिसांच्या स्वाधीन होत आपल्या करारी आवाजात त्यांनी इंग्रजांना ठणकावून सांगितले, की बहिऱ्यांना ऐकू यावे, यासाठी आम्ही आवाजाचा धमाका केला. सरकारने हिंदी जनतेवर चालवलेली जुलूमजबरदस्ती आणि निरपराध लोकांची हत्या व लाला लजपतराय यांची हत्या या साऱ्या गोष्टींचा आम्ही निषेध करत आहोत, तोही आमच्या मार्गाने! " माणसे मारणे हा आमचा उद्देश नाही; परंतु आमच्या मातृभूमीसाठी हे आम्हाला करणे भाग पडले." असे उद्गार काढताच 'इन्किलाब जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद' या घोषणांनी सभागृह दणाणून गेले.


भगतसिंग, बटुकेश्वर दत्त, सुखदेव, राजगुरू या सर्व क्रांतिकारकांनी तुरुंगात डांबून इंग्रजांनी त्यांच्यावर गुप्तपणे खटला सुरू केला. इकडे भारतीय जनतेत हे क्रांतिकारक मानाचे स्थान म्हणून भारतीयांच्या मनात बसले होते.


क्रांतिकारकांची वाढती लोकप्रियता पाहून इंग्रजांनी सर्व नियम धाब्यावर बसवून भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशीची शिक्षा सुनावली.


२३ मार्च, १९३१ रोजी या तिघांनाही फाशी देण्यात आली. मातृभूमीला अखेरचा सलाम करून तिचा निरोप घेतला. 'इन्किलाब जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद' असे म्हणत त्यांनी मृत्यूला मिठी मारली.


हसत हसत मृत्यूला सामोऱ्या जाणाऱ्या या थोर क्रांतिकारकांना माझा सलाम ! मित्रहो, एवढं बोलून माझे भाषण थांबवतो.


जय हिंद, जय भारत ! इन्किलाब जिंदाबाद !

Tuesday, September 27, 2022

पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका 09 5th Std Scholarship Exam Practice Paper 09

 





इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा सराव संच मालिका 
Test No.9 
सोडवण्यासाठी खालील चित्राला क्लिक करा.









महात्मा गांधी

                           



                             आज गांधीजींच्या जयंतीनिमित्ताने जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे, त्यासाठी उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष व व्यासपिठावर उपस्थित सर्व मान्यवर, माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना ज्ञानामृत पाजणारे गुरुजनवर्ग आणि माझ्या शालेय सवंगड्यांनो, आज मी गांधीजींच्या जीवनावर थोडे बोलणार आहे, ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे, अशी माझी नम्र विनंती आहे.

    'महात्मा गांधी' म्हणजे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक कर्तबगार आणि थोर नेते. महात्मा गांधी यांचा जन्म गुजरात राज्यातील पोरबंदर येथे झाला. मोहनदास करमचंद गांधी हे त्यांचे पूर्ण नाव. २  ऑक्टोबर १८६९  हा त्यांचा जन्मदिवस. राजकोट संस्थानचे दिवाण असलेल्या त्यांच्या वडिलांनी त्यांना चांगले शिक्षण दिले.

          मित्रहो , त्यावेळच्या शिक्षणात मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी गांधीजींनी इंग्लंड गाठले.ते बॅरीस्टर झाले आणि वकिली करू लागले.परदेशात वकिली करीत असतानाच काळे-गोरे हा जनमाणसातला भेदभाव त्यांना दिसून आला.रेल्वेच्या प्रवासात त्यांना भयानक गोष्टीला सामोरे जावे लागले. आगगाडीत कोणत्या वर्गात काळ्या लोकांनी बसायचे ,हे गोरे इंग्रज ठरवत असत.गोरे इंग्रज वर्णाने काळे असलेल्या लोकांवर अन्याय ,अत्याचार करत असत ,त्यांना गुलामासारखे वागवत असत.याच अनुभवाने प्रेरित होऊन महात्मा गांधीजींनी इंग्रजांविरुद्ध लढण्याचा दृढनिश्चय केला; पण त्यांनी इंग्रज राजवटीशी लढाई करण्यासाठी जो मार्ग निवडला तो म्हणजे अहिंसेचा .

        जनतेच्या हालअपेष्टा त्यांना पहावल्या नाहीत.भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी एक विचारांची अखंड चळवळ उभी केली.स्वातंत्र्याच्या वेडाने झपाटलेल्या नेत्यांना आपल्यात सामील करत त्यांनी इंग्रजाविरुद्धची फळी बळकट केली.भारतातील गरिबी ,उच्च नीच भेदभाव ,अंधश्रद्धा नष्ट व्हावी म्हणून त्यांनी योग्य ती पावले उचलली .अन्न ,वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजाही काही भारतीय लोकांना पुरेशा नव्हत्या .मित्रहो ,जनतेचे हे हाल गांधीजींना पहावले नाहीत.त्यांचे हळवे  हृदय  देशप्रेमाने आणि देशबांधवांच्या प्रेमाने गहिवरून आले.त्यांनी जनतेला अन्न,वस्त्र ,निवारा पुरेसा मिळावा म्हणून कार्य करण्याचे ठरवत स्वतःच्या भरजरी कपड्यांचा त्याग केला आणि सुटाबुटातील वकिली पेशातील गांधीजीनी फक्त पंचा नेसून अंगावर उपरणे घेत वावरू लागले.जणू त्यांनी शपथ घेतली होती .... मायभूमीला स्वातंत्र्याचे वस्त्र परिधान करण्याचे!

           एवढेच करून ते थांबले नाहीत.त्यांनी इंग्रजांविरुद्ध अनेक आंदोलने छेडली ,अनेक सत्याग्रह केले.इंग्रजांच्या जुलमी कारभाराचा त्यांनी निषेध केला.इंग्रजांच्या जाचक धोरणांना विरोध केला.त्यांच्या साध्या राहणीमानाला आणि  उच्च विचारांना भारून जनता त्यांना 'महात्मा', 'राष्ट्रपिता' 'बापूजी' म्हणू लागली.

त्यांच्या विचारांनी प्रभावित झालेली जनता रस्त्यावर उतरली.ते भारताला स्वातंत्र्य मिळवून  देण्याच्या ,स्वातंत्र्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी असलेल्या जनसमुदायाच्या साथीने गांधीजीनी जुलमी इंग्रजांना हैराण केले.

    'भारत छोडो', 'सायमन गो बॅक'  अशी आंदोलने छेडली .वेळप्रसंगी गोऱ्यांचा लाठीमारही त्यांनी सहन केला.सर्वधर्मसमभाव हा जनतेमध्ये जागवत भारतीय जनता एकसंघ बनवण्यासाठी मोलाचे कार्य केले.

              १५ ऑगस्ट १९४७ साली भारत स्वतंत्र झाला.अनेक नेत्यांनी आपआपल्या मार्गांनी देशासाठी योगदान दिले.त्यात गांधीजींचा सिंहाचा वाटा होता,असे म्हटले तर चूक ठरणार नाही.शस्त्र न उचलताही लोकशाहीच्या मार्गाने सरकारला धारेवर धरता येते , हेच त्यांनी जगाला दाखवून दिले.इंग्रज देश सोडून निघून गेले.देश स्वतंत्र झाला; परंतु देशाची फाळणी झाली.एकाच देशाचे दोन देश निर्माण झाले.काहींना ही गोष्ट खटकली आणि याच कारणामुळे ३० जानेवारी ,१९४८ रोजी महात्मा गांधीजींची हत्या झाली.ते काळाच्या पडद्याआड गेले.खरं 'महात्मा' म्हणजे महान आत्मा होते ते ! या महान नेत्यास त्रिवार अभिवादन ! 

जय हिंद, जय भारत !

Sunday, September 25, 2022

पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन टेस्ट 5th Standard Scholarship Online Tests

     इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा सराव करणेसाठी खालील 

   ऑनलाईन टेस्ट सोडवा व आपले गुण पहा .



 

































शिष्यवृत्ती परीक्षेसंबंधी अधिक व्हिडिओज पाहणेसाठी 
YouTube Channels पहा.












आजची नवीन पोस्ट पाहणेसाठी येथे क्लिक करा .






      

Friday, September 23, 2022

Use of - I am --- We are



नमस्कार विद्यार्थीमित्रांनो , 

आज आपण  I am व We are चा वापर कसा करावा याबद्दल पाहणार आहोत. यामध्ये आपल्याला 

I am व We are ची अनेक वाक्ये सरावासाठी दिलेली आहेत.त्यांचा अभ्यास करा. या घटकावरील  व्हिडीओ पाहण्यासाठी वरील चित्राला क्लिक करा.

I (आय) म्हणजे मी -

 बोलणारी व्यक्ती स्वतःबद्दल I हा शब्द वापरते. I हा शब्द एकवचनी आहे.

I चे अनेकवचन We (वी ) - म्हणजे आम्ही. I आणि We यांना प्रथम पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात.


Be ( बी ) - असणे . हे क्रियापद आहे.

वर्तमानकाळात I या कर्त्याबरोबर 

am ( अम  ) हे रूप वापरले जाते 

आणि We ( वी ) -

या कर्त्याबरोबर are ( आर ) हे रूप वापरले जाते .

उदाहरणार्थ - 

I am ---

We are -----

 I am किंवा We are एवढेच म्हणून पूर्ण अर्थ 

कळत नाही .त्यासाठी या शब्दांच्या पुढे

 मी काय किंवा कोण आहे तसेच आम्ही 

काय किंवा कोण आहोत , हे म्हणावेच लागते.

I am व We are ची सोपी वाक्ये.

ही वाक्ये एकवचन व अनेकवचन या 

स्वरूपात आपण पाहुयात.

I am a farmer.

आय ऍम अ फार्मर.

मी शेतकरी आहे.

We are farmers.

वी आर फार्मर्स.

आम्ही शेतकरी आहोत.

I am a peon.

आय ऍम अ प्यून.

मी चपराशी आहे.

We are peons.

वी आर प्यून्स.

आम्ही चपराशी आहोत.

I am an engineer.

आय ऍम अन इंजिनियर.

मी अभियंता आहे.

We are engineers.

वी आर इंजिनिअर्स.

आम्ही अभियंते आहोत.


I am an artist.

आय ऍम अन आर्टिस्ट.

मी कलाकार आहे.

We are artists.

वी आर आर्टिस्ट्स.

आम्ही कलाकार आहोत.



I am an architect.

आय ऍम अन आर्किटेक्ट.

मी एक वास्तूरचनाकार आहे.

We are architects.

वी आर आर्किटेक्ट्स.

आम्ही वास्तूरचनाकार आहोत.

I am a nurse.

आय ऍम अ नर्स.

मी परिचारिका आहे.

We are nurses.

वी आर नर्सेस.

आम्ही परिचारिका आहोत.

I am a lawyer.

आय ऍम अ लॉयर.

मी वकील आहे.

We are lawyers.

वी आर लॉयर्स.

आम्ही वकील आहोत.


I am a blacksmith.

आय ऍम अ ब्लॅकस्मिथ.

मी लोहार आहे.

We are blacksmiths.

वी आर ब्लॅकस्मिथ्स.

आम्ही लोहार आहोत.

I am a hunter.

आय ऍम अ हंटर.

 मी शिकारी आहे.

We are hunters.

वी आर हंटर्स.

आम्ही शिकारी आहोत.

I am a gardener.

आय ऍम अ गार्डीनर.

मी माळी आहे.

We are gardeners.

वी आर गार्डीनर्स.

आम्ही माळी आहोत.




I am a chemist.

आय ऍम अ केमिस्ट.

मी औषधविक्रेता आहे.

We are chemists.

वी आर केमिस्ट्स.

आम्ही औषधविक्रेते आहोत.

I am a soldier.

आय ऍम अ सोल्जर.

मी सैनिक आहे.

We are soldiers.

वी आर सोल्जर्स.

आम्ही सैनिक आहो

I am a sailor.

आय ऍम अ सेइलर.

मी खलाशी आहे.

We are sailors.

वी आर सेइलर्स.

आम्ही खलाशी आहोत.

I am a teacher.

आय ऍम अ टिचर.

मी शिक्षक आहे.

We are teachers.

वी आर टिचर्स.

आम्ही शिक्षक आहोत.

I am a milkman.

आय ऍम अ मिल्कमन.

मी गवळी आहे.

We are milkmen.

वी आर मिल्कमेन.

आम्ही गवळी आहोत.


I am a doctor.

आय ऍम अ डॉक्टर.

मी वैद्य आहे.

We are doctors.

वी आर डॉक्टर्स.

आम्ही वैद्य आहोत.

I am a tailor.

आय ऍम अ टेलर.

मी शिंपी आहे.

We are tailors.

वी आर टेलर्स.

आम्ही शिंपी आहोत.

I am a potter.

आय ऍम अ पॉटर.

मी कुंभार आहे.

We are potters.

वी आर पॉटर्स.

आम्ही कुंभार आहोत.

I am a watchman.

आय ऍम अ वॉचमन.

मी पहारेकरी आहे.

We are watchmen.

वी आर वॉचमेन.

आम्ही पहारेकरी आहोत.


I am a girl.

आय ऍम अ गर्ल.

मी मुलगी आहे.

We are girls.

वी आर गर्ल्स.

आम्ही मुली आहोत.

I am a boy.

आय ऍम अ बॉय.

मी मुलगा आहे.

We are boys.

वी आर बॉईज.

आम्ही मुलगे आहोत.

I am a merchant.

आय ऍम अ मर्चन्ट.

मी व्यापारी आहे.

We are merchants.

वी आर मर्चन्ट्स.

आम्ही व्यापारी आहोत.

I am a pedlar.

आय ऍम अ पेडलर.

मी फेरीवाला आहे.

We are pedlars.

वी आर पेडलर्स.

आम्ही फेरीवाले आहोत.


I am a carpenter.

आय ऍम अ कार्पेन्टर.

मी सुतार आहे.

We are carpenters.

वी आर कारपेंटर्स.

आम्ही सुतार आहोत.

I am a painter.

आय ऍम अ पेंटर.

मी चित्रकार आहे.

We are painters.

वी आर पेंटर्स.

आम्ही चित्रकार आहोत.

I am a mason.

आय ऍम अ मेसन.

मी गवंडी आहे.

We are masons.

वी आर मेसेन्स.

आम्ही गवंडी आहोत.







Thursday, September 22, 2022

केंद्रप्रमुख पदे सरळसेवेने भरण्याचा शासन आदेश





महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय

डॉ नीट मार्ग मध्यवती इमारत पुणे ४११००१.

क्र. प्राशिसं/^५०३/के.,प्र.वि.अ.सा./९६/७५,९५१०/२०२२ /3329


प्रति

दिनांक :-/०९/२०२२

शिक्षणाधिकारी

20 SEP 2022

विषय केंद्रप्रमुखांची रिक्त पदे सरळसेवेने व मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे भरण्याकरीता स्पर्धा परीक्षेचे आयोजन करणेबाबत.

प्राथमिक जिल्हा परिषद (सर्व)

संदर्भ- १. ग्रामविकास व जलसंधारण विभाग यांची अधिसूचना क्र. सेवा-२०१३ १०१/आस्था-९

दिनांक १० जून, २०१४

२. मा. मंत्री महोदय शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ०५/०९/२०२२

दिनांक ०७/०९/२०२२ पुणे येथे पार पडलेल्या बैठकीत मा.मंत्री महोदयांनी दिलेले निदेश

३. मा. आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ०१ यांचे पत्र जा.क्र.मरापप/वा/२०२२/४४४/ दिनांक १५/०९/२०२२

उपरोक्त संदर्भिय २ पत्र क्र. २ अन

मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ०७/०९/२०१२ रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व


उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे येथे पार पडलेल्या बैठकीत मा. मंत्री महोदयांनी केंद्रप्रमुखांधी दिक्त पदे विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा व पदोन्नतीद्वारे ५० ५० भरण्याचे प्रमाण निश्चित करण्याचे निर्देश दिलेले आहेत.


त्याअनुषंगाने कळवण्यात येते की, यासंदर्भात केंद्रप्रमुखांचे निमित सर्व शासन निर्णय दिनांक १० जून २०१४ ची अधिसूचना विचारात पेऊन केंद्रप्रमुखांचा दुनामावलीनुसार रिक्त पदांचा संचालनालयास त्यारित उपलब्ध करून द्यावा. केंद्रप्रमुखांच्या रिक्त पदांचा तपशिल उपलब्ध करुन दिल्यानंतर सर्व माहिती एकत्रित करुन मा. आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांना सादर करणे सुलभ होईल


सहपत्र : वरीलप्रमाणे

महेश पालकर) शिक्षण संचालक (प्राथमिक)

प्रत माहितीस्तव :

महाराष्ट्र राज्य, पुणे १

१.मा.वि शालेय शिक्षण क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२ २. मा. आयुक्त (शिक्षण) शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे- ४०० ००१

३. मा. आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे ०१ ४. नियती प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे



पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा सराव संच - 16

  

  इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा सराव संच - 16  

Visit us on :

Scholar Education YouTube Channel 






शिष्यवृत्ती परीक्षा सराव संच - 17

 




पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा सराव संच - 17 



Visit us on -   

 Scholar Education YouTube Channel 









Wednesday, September 21, 2022

कथा - शंभराची नोट

p> 

        कथा - शंभराची नोट

       एक हृदयद्रावक कथा 


         लेकानं दिलेली शंभराची नोट त्यानं मा खिशात ठेवली. झटपट काम संपवून तो बाहेर पडला. वेगात त्याची पावलं घराच्या दिशेनं ओढीनं निघाली. आता सण झोकात साजरा करायचे इमले तो मनात बांधू लागला. गेल्या कित्येक दिवसांत घरात काही गोडधोड शिजलेलं नव्हतं. पोरगं किती तरी दिवसापासनं खीर खायला मागतंय. आज पहिलं खिरीचं साहित्य आणायचं. बायकोची चमचमीत खायची इच्छा कित्येक दिवसांपासून आहे; पण जमलंच नव्हतं. आज ती जाम खूश होईल. मालकिणीनं दिलेली चोळी आणि पातळ जरा शिवून घेईल. यातलेच चार पैसे बाजुला ठेवतो म्हणजे आणखी चार दिवस तरी ताटात कसली ना कसली भाजी दिसेल. बटाट्याची रसभाजी खाऊन किती दिवस झाले? बाप रे, आठवतपण नाही. एक लॉटरीचं तिकीट काढू, बघू काय नशीब फळफळलं तर. चार वर्षांपूर्वी दिवाळीत घेतलेला सदराच जरा शिवून घेतो. तोच घालता येईल. लेकाला जुन्या बाजारातनं एखादा शर्ट मिळतोय का बघू. तो धुऊन घातला तर नवा शर्ट मिळाला म्हणून लेकरू खूश होईल. पोराटोरांत जरा मिरवून येईल. बरेच दिवस झाले नाक्यावरच्या गणपतीपुढं नारळ फोडलेला नाही. उद्या सण म्हणून नक्की फोडू. देव दयाळू असतो म्हणतात. या नारळाला जागून जरा त्रास तरी कमी होईल. चप्पल तुटली म्हणून पंधरा दिवस झालं घातलेली नाही, ती आधी दुरुस्त करून घेतो. पावण्या-रावळ्यात जायचं म्हटलं, की पायात काय नसलं की लाजल्यासारखं होतंय...


.त्याची विचारांची गाडी अगदी सुसाट सुटलेली. घराचं स्टेशन आलं आणि गच्चकन ब्रेक लावून गाडी थांबली. तो घरात शिरला..


नवऱ्याच्या चेहऱ्यावरील हसू बघून तिनं ताडलंच, आज काही तरी विशेष आहे. भाकरी करता करता ती लगबगीनं उठली. त्याच्या हातातली पिशवी तिनं काढून बाजूला ठेवली. पटकन त्याला पाण्याचा तांब्या भरून दिला आणि चहाचं आधण ठेवलं.


'काय आज खुशीत?' तिच्या प्रश्नावर त्यानं हसऱ्या चेहऱ्यानं 'हूं' म्हणत उत्तर दिलं.


तिनं बिनकानाच्या कपात चहा ओतला आणि त्याच्यासमोर ठेवला.


त्यानं चहाचा एक घोट घेतला... आता त्याला राहवेना. शंभराची नोट तिला दाखवूयाच म्हणत त्यानं खिशात हात घातला आणि शॉक बसल्यासारखा झटका त्याने हाताला दिला. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पार काळवंडला. चहाची चव एकदम कडवट झाली. तो तीन तीनदा फाटलेला खिसा तपासू लागला. खिसा फाटलाय हे विसरून त्याच खिशात शंभराची नोट आपण ठेवली हे त्याच्या आता लक्षात आलं. अंगावरच्या कपड्याला जेवढे म्हणून खिसे होते ते त्याने तपासले. कपडे काढून झाडले; पण ती नोट काही सापडायला तयार नव्हती.


'अहो, काय झालं? असं काय करताय? आनंदात घरात आला आणि आता एकदम काय झालं...?' ती न समजून सारखं विचारत राहिली.


नोट नाही हे समजल्यानं तो सैरभैर झालेला. तिचे प्रश्न त्याला ऐकू येत होते; पण उत्तर द्यायला मनापर्यंत पोचतच नव्हते. 'माझी नोट पडली, माझी नोट पडली' एवढंच तो म्हणत राहिला. काही तरी वाटून तो उठला आणि घरातनं धावत सुटला. ज्या रस्त्यानं आला होता, त्या रस्त्याचा कोपरा न कोपरा शोधत निघाला. येणाऱ्या-जाणाऱ्याला न् विचारू लागला.... माझी नोट सापडली का? कुणी नोट पाहिली का? येताना काय काय स्वप्नं आपण बघितली. सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. आता काही काही नाही. खीर नाही, चमचमीत जेवण नाही, पोराला चड्डी नाही, बायकोची चोळी नाही, लॉटरी नाही, घरात सण नाही... काही काही नाही... सगळा रस्ता त्यानं तीन तीनदा पाहिला. नोट सापडत नाही याची खात्री झाली. आणि तो डोक्याला हात लावून तिथंच बराच वेळ बसून राहिला, खचला. बऱ्याच वेळानंतर कधी तरी पाय ओढत

ओढत तो घरी

आला. उंबऱ्यातून आत जायचे त्राणच त्याच्यात उरले

नव्हते. तो दारातच बसून राहिला. काही क्षण शांततेत

गेले.


"आये, पप्पा आला!' म्हणत पोरगं येऊन पाठीवर

पडलं. एरवी फुलासारखं वाटणाऱ्या पोराला त्यानं

तिरीमिरीत झटकून टाकलं.


'आई गं!' म्हणून ते कळवळलं. 'असं काय

करताय!' म्हणत बायकोनं येऊन त्याला उचलून घेतलं.

त्यानं तिच्याकडे पण रागानं पाहिलं.


'बबल्या काय सांगतो ते तर ऐका.'


'हे बघ!' म्हणून बबल्यानं त्याच्या पुढं शंभराची

नोट नाचवली. तो उडालाच. हे कुठून आले? विचारत

त्यानं बबल्याकडून नोट हातात घेतली.


रडवेल्या चेहऱ्यानं बबल्या म्हणाला, "खेळत खेळत

बाजारात गेलोतो, येताना वाटेत गावली."


त्यानंतर बबल्या काय काय सांगत राहिला; पण

त्याला काही ऐकू आलं नाही. त्याच्या डोळ्यांतून

आनंदाश्रू वाहू लागले. त्यानं बबल्याला छातीला

कवटाळून मटामट मुके घेतले. बायकोच्या पाठीवर

हात टाकला. आता त्यांचा सण झोकात साजरा होणार

होता!

Tuesday, September 20, 2022

लाल बहादूर शास्त्री मराठी भाषण, Lal Bahadur Shastri Marathi Speech



लाल बहादूर शास्त्री जयंती मराठी भाषण 

आजच्या या शुभ दिवशी लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनावर भाषण देण्याची संधी मिळाल्याने मी स्वतःला खूप भाग्यवान समजत आहेआणि मला आशा आहे की माझ्या या भाषणातून सर्वांना लाल बहादूर शास्त्रीजींच्या कार्याबद्दल माहिती देऊ शकेल.

         लाल बहादूर शास्त्रीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 ला ब्रिटीश काळात उत्तर प्रदेशातील मुघलसराय येथे झाला होता.ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान झाले होते.सोबतच भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते.





        लाल बहादूर शास्त्रीजी गांधीजींच्या साहस व अहिंसेच्या विचारांनी प्रभावित होते.लाल बहादूर शास्त्री यांचे वडील मुन्शी शारदाप्रसाद श्रीवास्तव एका प्राथमिक शाळेत शिक्षक होते.त्यांच्या आईचे नाव रामदुलारी होते.शास्त्रीजींच्या जन्माच्या 18 महिन्यानंतरच त्यांच्या वडिलांचे निधन झाले.ज्यामुळे त्यांच्या आई त्यांना घेऊन माहेरी आल्या.






       लाल बहादूर शास्त्री यांनी हरिश्चंद्र हायस्कूल आणि काशी विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले.येथूनच त्यांनी संस्कृत भाषेत पदवी पूर्ण करून 'शास्त्री' ही  उपाधी धारण केली .

       भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी 'मरो नाही मारो' ची घोषणा दिली .त्यांच्या या घोषणेमुळे संपूर्ण देशात स्वातंत्र्याची भावना तीव्र झाली.शास्त्री यांनी महात्मा गांधीजींच्या सर्व आंदोलनात सक्रीय पद्धतीने पुढाकार घेतला.1921 मधील असहयोग आंदोलन ,1930 मधील दांडी यात्रा व 1942 मधील 'भारत छोडो आंदोलनात' त्यांनी महत्वाची भूमिका बजावली.भारत छोडो आंदोलनात इतर नेत्यांसोबत लाल बहादूर शास्त्री यांनाही इंग्रजांनी अटक केली.






          भारताच्या स्वातंत्र्यानंतर लाल बहादूर शास्त्री यांना उत्तर प्रदेशाच्या संसदेचे सचिव बनवण्यात आले.1947 मध्येच त्यांना 'पोलीस आणि वाहतूक मंत्रीही' बनवण्यात आले.त्यांनी पहिल्यांदा बसमध्ये महिला कंडक्टर ची नियुक्ती केली होती.1964 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मृत्युनंतर त्यांना भारताचे पंतप्रधान म्हणून निवडण्यात आले.त्यांनी दुध उत्पादनात वाढ करण्यासाठी 'श्वेतक्रांतीला'ही प्रोत्साहन दिले.भारतात धन्यउत्पादन वाढविण्यासाठी 'हरितक्रांतीला'ही प्रोत्साहन दिले.

       त्यांच्या कार्यकाळात 1965 मध्ये भारताने पाकिस्तानसोबत एक आक्रमणाचा सामना केला.त्यांनी पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्यासाठी भारतीय सेनेला स्वतंत्रता दिली आणि देशात अधिक लोकप्रियता मिळवली.23 सप्टेंबर 1965 ला भारत-पाकिस्तान युद्ध समाप्त झाले.






       10 जानेवारी 1966 ला रशिया आणि अमेरिका यांच्या दबावाखाली लाल बहादूर शास्त्री भारत-पाकिस्तान शांती करारारावर स्वाक्षरी करण्यास तयार झाले.पाकिस्तानचे राष्ट्रपती अयुब खान आणि भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची भेट रशियातील ताश्कंद येथे झाली.असे म्हटले जाते की त्यांच्यावर दबाव टाकून हस्ताक्षर करण्यास सांगितले गेले.11 जानेवारी 1966 मध्ये कराराच्या रात्री अतिशय रहस्यपूर्ण पद्धतीने त्यांचा मृत्यू झाला.त्यावेळी सांगण्यात आले की त्यांचा मृत्यू हृदयविकाराने झाला.परंतु त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले नाही .






        लाल बहादूर शास्त्री यांनी निस्वार्थपणे देशाची सेवा केली.चला आज आपण सार्वजण मिळून लाल बहादूर शास्त्री यांच्या महान कार्याला अभिवादन करू !

       आज आवश्यकता आहे की,आपल्या देशातील सर्व नेत्यांनी लाल बहादूर शास्त्री यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करायला हवे.असे केल्यास देशाला प्रगतीपथावर पुढे जाण्यास कोणीही रोखू शकत नाही.








  आपण सर्वांनी माझे भाषण शांतचित्ताने ऐकून घेतले त्याबद्दल  धन्यवाद ! 

  जय हिन्द ! जय भारत !

        

    

           महात्मा गांधी जयंती मराठी भाषण 

 

Monday, September 19, 2022

शिक्षक जिल्हातर्गत बदली महत्वाचे अपडेट


प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदली महत्वाची अपडेट

दिनांक -19 सप्टेंबर 2022 चे पत्र 







क्रमांक. जिपव-२०२२/प्र.क्र.२९/आस्था-१४

दिनांक : १९ सप्टेंबर, २०२२.

प्रति

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व).

विषय : जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत.







संदर्भ : १) ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्र. जिपब ४८२०/प्र.क्र.२९० / आस्था. १४.


दिनांक ७.४.२०२१. २) क्रमांक. ऑजिब- २०२२/प्र.क्र.३४ /आस्था-१४. दिनांक ७.४.२०२१ चा शासन निर्णय दिनांक ३०.८.२०२२ चे पत्र.


उपरोक्त विषयाबाबत संदर्भाधीन शासन निर्णय व शासनपत्राचे कृपया अवलोकन व्हावे.








२. जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे अतिरजिल्हा बदल्यांबाबत दिनांक २२.८.२०२२ रोजी आदेश निर्गमीत झाल्याने प्रथम टप्पा पुर्ण झाला आहे. सदर आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना दिनांक ५.९.२०२२ पर्यंत कार्यमुक्त करण्याबाबत संदर्भाधीन दिनांक ३०.८.२०२२ च्या पत्रान्वये सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यास अनुसरुन आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या शिक्षकांना संबंधित जिल्हा परिषदांनी शासन निर्णयातील तरतुदीनुसार पदस्थापना देण्याबाबतची कार्यवाही आपल्या स्तरावरुन सुरु असेलच.







आता, जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे जिल्हांतर्गत बदल्यांबाबतची कार्यवाही सुरु करावयाची आहे. त्याकरिता दिनांक ३१.८.२०२२ पर्यंत सेवानिवृत्त / निधन किंवा अन्य कारणामुळे रिक्त झालेली पदे त्याचप्रमाणे आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केल्यानंतर झालेल्या रिक्त जागा तसेच आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या शिक्षकांच्या समायोजनानंतर उर्वरित रिक्त पदे, संभाव्य रिक्त पदे याबाबतचा संपूर्ण तपशील ऑनलाईन बदली प्रणालीवर अद्ययावत करण्यात यावा.







३. दिनांक ३१.८.२०२२ पर्यंतची रिक्त पदांची माहिती ऑनलाईन संगणकीय प्रणालीवर अद्ययावत केल्यानंतर, आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या शिक्षकांना पदस्थापना न देता जिल्हांतर्गत बदल्यांबाबतची कार्यवाही पुर्ण झाल्यानंतर शासन निर्णयातील तरतुदीनुसार समायोजनाने पदस्थापना देण्याची कार्यवाही करण्यात यावी. जेणेकरुन एकाच जागेवर दोन शिक्षकांची नियुक्ती होणार नाही. त्यामुळे जिल्हांतर्गत बदल्यांबाबतची कार्यवाही विनाव्यत्यय पार पाडली जाईल, याची कृपया दक्षता घ्यावी, ही विनंती.


(का. गो. वळवी ) उप सचिव, महाराष्ट्र शासन

Sunday, September 18, 2022

२ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती भाषण

 

 


  

 

                                                      महात्मा गांधी


        ज्यांनी जगाला आणि राष्ट्राला शांततेचा संदेश दिला.आपल्या कृतीतून व विचारातून सत्याचा मार्ग दाखवला,सत्यातून परिवर्तन होऊ शकतं व देश स्वातंत्र्य होऊ शकतो हे ज्यांनी जगाला दाखवून दिलं त्या महात्मा गांधींच्यावरती बोलण्यासाठी आपल्यासमोर उभा आहे.

        महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी.

गांधीजींचा जन २ ऑक्टोबर १८६९ साली गुजरातमध्ये पोरबंदर या ठिकाणी झाला .सधन कुटुंबात जन्माला आलेले गांधीजी दहावीच्या शिक्षणानंतर विदेशामध्ये विलायतीला शिक्षणासाठी निघून गेले.प्रचंड अभ्यास व आत्मविश्वासाच्या बळावरती बापुजींनी बरीस्टर ही पदवी संपादन केली.पाश्चिमात्य राष्ट्रात ज्यावेळी बापुजी गेले,त्यावेळी बापूजीना असमतोल पहावयास मिळाला.गांधीजी ज्यावेळी आफ्रिकेत होते त्यावेळी काळे गोरे या भेदभावाला बापूजींना सामोरेजावे लागले,त्याचवेळी बापूजींच्या हळव्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला.ज्या ठिकाणी मनुष्याला पशुसारखी वागणूक मिळत असेल तर त्या ठिकाणी इतरांचे जीवन कसे असेल हा प्रश्न बापूजींच्या समोर उभा राहिला.त्याचवेळी गांधीजींनी आफ्रिकेमध्ये परिवर्तनाच्या लढाईस सुरुवात केली.

      






काही कालखंडानंतर बापूजी भारतामध्ये आल्यानंतर एका नवीन लढ्याला सुरुवात करावी अशीच मानसिकता बापूजींच्या मनामध्ये निर्माण झाली .तेव्हाच बापूजींनी परकीय सत्तेविरुद्ध संयम, त्याग ,शांतता यांच्या माध्यमातून एका नव्या लढाईस सुरुवात केली.बापूजींनी १९२० च्या कालखंडामध्ये असहकार चळवळीची सुरुवात केली.या देशातल्या सामन्यातला सामान्य जनतेला ब्रिटिश या देशाचे प्रशासक नसून ते या जनतेचे शोषक आहेत.व्यापारी म्हणून आलेले इंग्रज या देशाचे राज्यकर्ते बनले आहेत.हे इथल्या भारतीयांना पटवून देण्याचा प्रयत्न केला.

  


'दे   दी हमें   आजादी  

बिना खड्ग बिना ढाल 

साबरमती के संत 

तुने कर दिया कमाल '







१८ व्या शतकाच्या अखेरीस आपला देश ब्रिटीशांच्या विरुद्ध पेटून उठला होता.सगळीकडे   आंदोलने,मोर्चे ,खून जाळपोळ लाठीमार  यांचे वातावरण होते.अशा  परिस्थितीमध्ये एक अद्वितीय  व्यक्तिमत्व उदयाला येत होते ते म्हणजे आपले सर्वांचे लाडके राष्ट्रपिता 'महात्मा गांधी'.

एकीकडे इंग्रजांच्या अत्याचारामुळे सामान्य जनता त्रस्त झाली होती ,तर दुसरीकडे गांधीजींच्या सत्य,अहिंसा ,दया ,प्रेम,करूणा यांसारख्या तत्वांनी लोकांना दिलासा मिळत होता .अहिंसेच्या मार्गाने चाललेली 'चले जाव 'चळवळ तसेच असहकार चळवळ यांमुळेच ब्रिटिशांना आपला देश सोडून जाने भाग पडले आणि आपला देश स्वतंत्र होऊ शकला.








या स्वातंत्र्यलढयाबरोबरच   त्यांचे अन्य जीवनकार्यही आदरणीय असेच आहे.ते एक थोर समाजसेवक होते .त्यांना भारतात केवळ स्वराज्य नको होते तर त्यांना 'सुराज्य' प्रस्थापित करावयाचे होते .त्यासाठी ते आयुष्यभर स्वतः झटले .तळागाळातल्या ,गोरगरीब ,अस्पृश्य,उपेक्षित अशा अनेकांचा त्यांनी उद्धार केला.त्यांचे दुःख ,पिडा पाहून ते रात्रंदिवस तळमळत असत.या देशातल्या गरीब लोकांना जर पुरेसे अन्न,वस्त्र ,निवारा अशा मुलभूत सुविधाही मिळत नसतील तर आपण सुखसुविधा का घ्यायच्या ? या विचाराने ते झपाटून गेले  आणि मग 'साधी राहणी आणि उच्च विचारसरणी' हे त्यांचे तत्वच बनले.







शहराकडे जाणारा वाढता ओघ पाहून त्यांनी 'खेड्याकडे चला ' हा संदेश दिला .तर स्वच्छता ,आरोग्य आणि श्रमाचे महत्व स्वतःच्या कृतीतून पटवून दिले.हरिजनांना त्यांनी स्वतः जवळ केले.स्त्री-शिक्षण ,ग्रामोद्धार याला प्राधान्य दिले .त्यांचे हे अलौकिक कार्य देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले.अनेक ज्येष्ठ -श्रेष्ठ व्यक्ती त्यांचे अनुयायी बनले.हळूहळू त्यांची कीर्ती साऱ्या विश्वात पोहोचली.सत्य,अहिंसा ,सहिष्णुता आणि सहकार ही त्यांची चतुःसूत्री साऱ्या जगाने मान्य केली.

आपल्या समाजाला प्रगतीच्या वाटेने पुढे नेतो तो नेता . या थोर नेत्याने सर्व देशवासियांना आपलेसे केले.लोक त्यांना 'बापू' म्हणत . साऱ्या जगासाठी ते 'महात्मा' झाले आणि एखाद्या पित्याप्रमाणे ते देशासाठी झटले.म्हणून ते 'राष्ट्रपिता महात्मा गांधी 'झाले.







हल्लीच्या युगात स्वार्थासाठी ,सत्तेसाठी लढणाऱ्या नेत्यांना पहिले की, मन उद्विग्न होते .महात्मा गांधीजींच्या अंगी असणाऱ्या अनेक गुणांपैकी थोडे जरी गुण या नेत्यांनी आत्मसात केले तर किती छान होईल  बरे ! एक आदर्श व्यक्तिमत्व ,एक थोर नेता म्हणून ते नेहमीच वंदनीय आहेत .कारण ...

'दिव्यत्वाची जेथ प्रचिती 

तेथे कर माझे जुळती '