Wednesday, September 7, 2022

उतारा व त्यावरील प्रश्न संच 01

 

खालील उतारा नीट वाचून त्याखालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या .

 गुण – ६

नागझिरा अरण्यात १९७८ सालच्या मे महिन्यात मी महिनाभर तळ्याच्या काठी असलेल्या झोपडीत राहिलो आणि वानरांच्या टोळ्या पहिल्या.रेखाटनं केली .नोंदी केल्या .त्यातूनच जे पुस्तक जन्माला आलं – ते नागझिरा .ह्या पुस्तकात वानरं म्हणून एक स्वतंत्र प्रकरण आहे.वानरांच्या दोन टोळ्या मला इथे बघायला मिळाल्या .ही माणसांच्या फार जवळची आहेत , असं वाटायला लावील ,असंच वानरांचं सगळं वागणं होतं.नागझिराच्या निवांत मुक्कामात निरीक्षणाशिवाय मला दुसरा काही उद्योग नव्हता .वानरं पुष्कळ होती.बुजरी नव्हती .ह्या अरण्यात चितळ होती,रानडुक्करं होती,गवे होते ,रानकुत्री होती.ह्या सर्व प्राण्यांपेक्षा वानरं जास्त होती.ती सहज दृष्टीला पडत.एखादी टोळी हेरून तिचा दिवसभराचा दिनक्रमही पाहता येई.मी रानात केलेले निरीक्षण , इतर अभ्यासकांनी भारतात वेळोवेळी केलेल्या निरीक्षणांवर आधारित ग्रंथांचं वाचन ,कल्पकता यांचं मिश्रण होऊन त्यातून ‘सत्तांतर’हे पुस्तक जन्माला आले.

 

प्रश्न -१ – या उताऱ्यातून किती पुस्तकांचा जन्म झाल्याचे सांगितले आहे ?

१ ) एक

२) दोन

३) तीन

४) एकही नाही
प्रश्न -२- लेखकाने ही पुस्तके कोणत्या प्राण्याविषयी लिहिली आहेत ?

१) गवे

२) रानकुत्री

३) वानरे

४) चितळे

प्रश्न -३- या उताऱ्यातून लेखकाला कोणत्या गोष्टीविषयी सांगायचे आहे ?

१) कल्पकता व निर्मिती

२) फिरणे

३) निवांतपणे राहणे

४) प्राण्यांना पाहणे

 

 

 

 

 

उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे लाल रंगाने ठळक केली आहेत ती पुढीलप्रमाणे –

प्रश्न -१ – या उताऱ्यातून किती पुस्तकांचा जन्म झाल्याचे सांगितले आहे ?

१ ) एक

२) दोन

३) तीन

४) एकही नाही
प्रश्न -२- लेखकाने ही पुस्तके कोणत्या प्राण्याविषयी लिहिली आहेत ?

१) गवे

२) रानकुत्री

३) वानरे

४) चितळे

प्रश्न -३- या उताऱ्यातून लेखकाला कोणत्या गोष्टीविषयी सांगायचे आहे ?

१) कल्पकता व निर्मिती

२) फिरणे

३) निवांतपणे राहणे

४) प्राण्यांना पाहणे

 

 

No comments:

Post a Comment