Monday, October 31, 2022

सरदार वल्लभभाई पटेल Sardar Vallabhabhai Patel







 सरदार वल्लभभाई पटेल

  Iron Man Of India 

 Sardar Vallabhbhai Patel 

 नमस्कार मित्रांनो ,आज आपण सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित माहिती पाहणार आहोत.

सरदार वल्लभभाई पटेल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे के वरिष्ठ नेता होते आणि भारतीय गणराज्य स्थापन करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता.वल्लभभाई झावेरभाई पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ मध्ये नडियाद ,गुजरातमध्ये झाला होता.त्यांच्या वडिलांचे नाव झावेरभाई आणि आईचे नाव लाढबाई असे होते.

वल्लभभाई पटेल यांचे वडील एक शेतकरी होते.त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या युद्धामध्ये 'झाशीच्या राणीच्या सेनेमध्ये कार्य केले होते.सरदार पटेल यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण आपल्या स्थानिक शाळेमधून आपल्या वडिलांबरोबर शेतीचे काम करत पूर्ण केले होते.सरदार पटेल लहानपणापासूनच बुद्धिमान ,साहसी आणि दृढसंकल्प ठेवणारे व्यक्ती होते.ते नेहमी अन्यायाविरुद्ध आवाज उठवत असत.याच गुणांमुळे त्यांना वकील बनायचे होते.

पैशांची कमी असूनही त्यांनी आपल्या मित्रांकडून पुस्तके मागून वकिलीचा अभ्यास केला आणि जिल्हा वकिलाची परीक्षा ते पास झाले.त्यांनी गोध्रा,गुजरातमध्ये आपली वकिली करायला सुरुवात केली.१९०२ मध्ये ते वलसाड येथे आले आणि जिल्हा मुख्यालयामध्ये यशस्वीपणे ८ वर्षे गुन्हेगारीवर वकिली केली.जेणेकरून त्यांनी आपल्या कुटुंबाला आर्थिक रूपाने स्थिर केले. 

पैशांची कमी दूर केल्यानंतर त्यांनी विवाह केला.त्यांना दोन मुले होती.सन १९१० मध्ये उच्च शिक्षण प्राप्त करण्यासाठी ते लंडनला गेले आणि तेथे परीक्षांमध्ये प्रथम आले.मग ते भारतात परतल्यावर अहमदाबाद येथे वकिली करू लागले.




जेव्हा सरदार पटेल १९१७ मध्ये महात्मा गांधीजींना भेटले तेव्हा त्यांचे जीवन पूर्णपणे बदलून गेले.जेव्हा त्यांनी गांधीजींचे स्वतंत्र भारताचे स्वप्न आणि अहिंसेचे तत्वज्ञान बघितले .सन १९१८ मध्ये गुजरातच्या खेडा येथे भयंकर दुष्काळ पडला होता .म्हणून शेतकऱ्यांनी इंग्रज सरकारला करमाफी करण्याचे निवेदन केले पण इंग्रज सरकारने ते नाकारले.तेव्हा सरदार पटेल यांनी शेतकऱ्यांचे नेतृत्व केले आणि शेतकऱ्यांना कर न देण्यास सांगितले.सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासमोर इंग्रज सरकारला माघार घ्यावी लागली आणि कर माफ करावा लागला.हे सरदार पटेल यांचे पहिले मोठे यश होते.



 बार्डोली सत्याग्रहाच्या निमित्ताने सन १९२८ मध्ये गुजरातमध्ये एक प्रमुख किसान आंदोलन झाले,ज्याचे नेतृत्व स्वतः सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले होते.या आंदोलनामध्ये इंग्रज सरकारला माघार घ्यायला भाग पाडले होते आणि सरदार पटेल यांच्यामुळे शेतकऱ्यांचा विजय झाला होता.या सत्याग्रहाच्या यशानंतर लोकांनी वल्लभभाई पटेल यांना 'सरदार' ही उपाधी दिली होती,ज्याचा अर्थ आपला मुख्य किंवा आपला राजा असा होतो.तेव्हापासून त्यांना सरदार वल्लभभाई पटेल या नावाने ओळखले जाऊ लागले.

सरदार वल्लभभाई पटेल यांनी इंग्रज सरकारच्या विरोधात खूप सारी आंदोलने केली.१९४२ मध्ये महात्मा  गांधीजींच्या 'भारत छोडो' आंदोलनामध्ये सरदार पटेल यांनी पूर्ण सहकार्य केले.त्यांना याच कारणामुळे तुरुंगवासदेखील झाला होता.

     स्वातंत्र्याच्या आधी आपला भारत देश ५८४ राज्यांमध्ये वाटला गेला होता.सरदार पटेल यांनी या राज्यांना एकत्र आणण्यावर जोर दिला होता आणि सर्व राज्यांना इंग्रजसरकारविरुद्ध होण्यास सांगितले होते.ते पूर्ण देशाला एक करण्याच्या प्रयत्नांमध्ये होते.त्यांना Iron Man Of India भारताचे पोलादी पुरुष ही उपाधी दिली होती.कारण आज आपला भारत देश एकसंघ भारत देश पाहतो आहोत तो सरदार पटेल यांच्या या कार्यामुळेच.

१९४७ मध्ये ते स्वतंत्र भारताचे पहिले उपप्रधानमंत्री आणि गृहमंत्री बनले.त्यांनी IAS आणि IPS चि स्थापना करण्यामध्ये सहाय्य केले होते.म्हणून त्यांना भारतीय सेवेचा संरक्षक संत असेही म्हटले जाते.

१५ डिसेंबर १९५० मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.त्यांच्या अंतिम संस्कारासाठी १० लाख लोक आले होते.त्यांना त्यांच्या कार्यामुळे 'भारतरत्न' हा पुरस्कार देण्यात आला होता.भारतात खूप सारी महाविद्यालये आणि  संस्था  त्यांच्या नावाने उघडण्यात आल्या आहेत.

  गुजरातमध्ये सरदार सरोवर बांध आहे जो नर्मदा नदीवर स्थित आहे.तिथे सरदार पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा बांधण्यात आला आहे.'Statue Of Unity' 'स्टॅच्यू ऑफ युनिटी ' या नावाने तो प्रसिध्द आहे.



सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस 'राष्ट्रीय एकता दिवस' या नावाने साजरा केला जातो.

धन्यवाद ! 


आपल्याला हा लेख कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा.

Tuesday, October 25, 2022

प्रभावी सूत्रसंचालनासाठी कविता व चारोळ्या


मुक्या जीवांचे दुःख 

कोरडे जे शेत आहे 
ओलित झाले पाहिजे 
मुक्या जीवांचे दुःख ह्या 
बोलीत आले पाहिजे  .... ( धृ .)

छते उन्हाची घराला 
नांदते जीव पोळती 
फुफाट्याच्या वाहणा 
पायामाधुनी घालती 
दाह त्यांच्या वेदनांचे 
झेलित गेले पाहिजे ..... (१) 

आभाळ अंतरातले 
सोसताना फाटलेले 
अश्रु दो डोळ्यातले 
गळताना दाटलेले 
महापुरांना बांध ह्या 
घालीत गेले पाहिजे .... (२) 

नांगरल्या  शेतापरी 
काळीज दुःख साहते 
तरी सुगीचे डोलत्या 
स्वप्न हिरवे पाहते 
अर्थ ह्या स्वप्नातही 
पेरीत गेले पाहिजे 
मुक्या जीवांचे दुःख ह्या 
बोलीत आले पाहिजे ... ( ३) 


-----------------------------------------------------------------------------------------------


ज्यांची बाग फुलून आली ...

ज्यांची बाग फुलून आली , 
त्यांनी दोन फुले द्यावीत 
ज्यांचे सूर जुळून आले, 
त्यांनी दोन गाणी द्यावीत 

सूर्यकुलाशी ज्यांचे नाते,
त्यांनी थोडा उजेड द्यावा 
युगायुगांचा अंधार जेथे ,
पहाटेचा गाव न्यावा .

ज्यांच्या अंगणी ढग झुकले ,
त्यांनी ओंजळ पाणी द्यावे .
आपले श्रीमंत हृदय त्यांनी ,
रिते करून भरून घ्यावे .

आभाळाएवढी ज्यांची उंची ,
त्यांनी थोडेसे खाली यावे .
मातीत ज्यांचे जन्म मळले ,
त्यांना वरती उचलून घ्यावे .

( दत्ता हलसगीकर )
गणेश तात्याराव हलसगीकर 
------------------------------------------------


      प्रेरणादायी कविता 




ढाळू नकोस अश्रु , पुसणार नाही कोणी 
दुःखात साथ द्याया ,असणार नाही कोणी ..
जीवनास फुलवण्याचे जरि मार्ग खुंटले रे 
तुझ्याच दैवताने जरि तुझ लुटले रे ..
तरी साक्ष द्यावयाला , मिळणार नाही कोणी .....ll १ ll 
मिटती न दैवरेखा , वाहुनि आसवांना 
सुटती न दैव रेखा , भिउनी यातनांना 
ती हाक यातनेची ना ऐकणार कोणी .... ll २ ll 
स्वार्थी जगात वेड्या , मिळणार काय आहे ? 
तो देवही भुकेला , नैवेद्य शोधताहे 
पदरात दान तुझ्या , देणार नाही कोणी 
दुःखात साथ द्याया , असणार नाही कोणी .. ll ३ ll 

-----------------------------------------------------------









नमस्कार ,

या लेखामध्ये आपण प्रभावी सूत्रसंचालनासाठी विविध कवी/कवयित्री यांच्या प्रभावी कवितांच्या ओळी ,विविध लेखक ,विचारवंत ,समाजसुधारक यांचे विविध विषयावरील  प्रभावशाली विचार आपण पाहणार आहोत.




प्रभावी सूत्रसंचालनासाठी कविता व चारोळ्या  


जीवनगाणे 

आपण एक थेंब व्हावं ,

की काळाच्याही पटलामधून 

झरता आलं पाहिजे .

आपण एक कोंब व्हावं ;

की जगण्याचाही मातीमधून 

स्फुरता आलं पाहिजे !


मला वाटतं जगणं फक्त 

त्यालाच जमून जातं ,

झरा होऊन अवखळपणे 

ज्याला वाहता येतं .

काय म्हणून सुखासाठी 

गाऱ्हाणी घेऊन बसायचं ;

दुःख आलं त्याच्या सोबत 

गाणी म्हणत हसायचं !

वसंत होऊन मनात 

शिशिर झेलता आलं पाहिजे ,

बाण सोडायचा आहे ना दूर ,

तर जवळचं धनुष्य पेलता आलं पाहिजे .

मला वाटतं जगणं फक्त 

त्यालाच जमून जातं ,

झरा होऊन अवखळपणे 

ज्याला वाहता येतं .

जगणं म्हणजे स्वतःलाच 

पेरून उगवलं पाहिजे ;

आपलं झाड आहे 

आपणच जगवलं पाहिजे !

जगणं म्हणजे झुरणं नाही ,झरणं असतं

जगणं म्हणजे मरणं नाही ,मुरणं असतं !

मुक्त मुक्त होऊन ज्याला 
अविरतपणे झरता येईल 
उंच उंच वाढविण्यासाठी 
खोल खोल मुरता येईल .

मला वाटतं जगणं फक्त 

त्यालाच जमून जातं ,

झरा होऊन अवखळपणे 

ज्याला वाहता येतं .

------------------------------------------------------


जसा येणार बहर,तसा जाणार झडून 

गळणाऱ्या पानासाठी ,काय फायदा रडून ,

काय फायदा रडून ,जिणं हसत जगावं 

अन मातीच्या कुशीत सोनं होऊन मरावं  

---------------------------------------------------------


टेढमेढी राहो पर तू ,धीरे धीरे चलना सीख 

चांद जैसा शीतल बन और

 सूरज जैसा जलना सीख 

काटों के संग  रहकर भी तू 

फुलों जैसा खिलना सीख 

मिट्टी का तू है पुतला 

तो हर सांचे में जलना सीख

--------------------------------------------------------- 


कवयित्री बहिणाबाई 

घरची अस्तुरी जसा हळदीचा गाभा ,

पराया नारीसाठी पुरुष गल्लीवरी उभा 

घरची अस्तुरी जसं कापसाचं बोंड ,

पराया नारीसाठी धुतो गल्लीवरी तोंड .

-------------------------------------------------------


वरचा वळ असो की आतली कळ 

आईकडून घ्यावं सोसण्याचं बळ .

----------------------------------------------------------


बेटा -बेटी 


बेटा वारीस है,

तो बेटी पारस है 

बेटा वंश है ,बेटी अंश है 

बेटा आन है,बेटी शान है 

बेटा  तन है ,बेटी मन है

बेटा मान है,बेटी गुमान है 

बेटा संस्कार है,बेटी संस्कृती है 

बेटा आग है,बेटी भाग है 

बेटा दवा है,बेटी दुआ  है 

बेटा भाग्य है,बेटी विधाता है 

बेटा शब्द है,बेटी अर्थ है 

बेटा गीत है,बेटी संगीत है

 बेटा प्रेम है, बेटी पूजा है 

---------------------------------------------------------


'लेक वाचवा - लेक शिकवा' प्रास्ताविक 

वंशाला दिपक हवा म्हणणारे आपण वंशाची पूर्तता या मुलींमध्ये असते हेच विसरून जातो.मुलगा किंवा मुलगी याही आधी एक माणूस म्हणून पाहायचं विसरतो .सोनुल्या लेकीला,गोड बहिणीला ,प्रेमळ प्रेमिकेला ,लाडक्या बायकोला ,आदरणीय आईला आणि या सत्यात सामावणाऱ्या स्त्री शक्तीला विसरून जातो.आई-वडिलांच्या उबदार पंखाखाली वाढणारी सोनुली वास्तवाच्या जगात गेल्यावर तिला आपल्यासारखा त्रास नको म्हणून तिचं येणंच नाकारतो .

   'कायम रडणारी बाहुली'  असं हिणवून घेणारी छकुली ,तिला तिचं विश्व सोडून नव्या जगात सामावायचं असतं याची जाणीव घेऊन जगत असते .छोटीशी सुंदर परी प्रत्येकाच्याच अंगणात खेळायला हवी बागडायला हवी .

----------------------------------------------------------

आयुष्यात कोण येणार ,ही वेळ ठरवते 

आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे .हे हृदय ठरवते 

पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभाव ठरवतो .


ज्याला चेतना असतात ,त्याला वेदना होतात ,

अन ज्याला भावना असतात ,त्यालाच यातना होतात.


'साऱ्या कोवळ्या जीवांना अक्षरांचा स्पर्श व्हावा ,

उजेडाचे दान देण्या ,झोपडीत सूर्य यावा ,

नको असा एक हात ,जो पाटीला पारखा ,

पुस्तकाला स्पर्श व्हावा ,त्याच्या आईसारखा .

-------------------------------------------------------------

कविता - थोडं जगून बघ

जन्माला आला आहेस ,थोडं जागून बघ ,

जीवनात दुःख खूप आहे ,थोडं सोसून बघ 

चिमुटभर दुःखानं कोसळू नकोस ,

दुःखाचे पहाड चढून बघ 

अपयश येतं,निरखून बघ डाव मांडणं सोपं असतं 

थोडं खेळून बघ 

घरटं बांधणं सोपं असतं ,थोडी मेहनत करून बघ 

जगणं कठीण मरणं सोपं असतं 

दोन्हीतल्या वेदना झेलून बघ 

जिणं -मरणं एक कोडं असतं ,

जाता जाता एवढं सोडवून बघ .

-----------------------------------------------------------

कवी यशवंत 

या मातीच्या कणाकणातून ,

तुझ्या स्फूर्तीची फुल्तीला सुमने 

जोवर भाषा असे मराठी ,

यशवंताची घुमतील कवणे 

हिमालयावर येत घाला ,

सह्यगिरी हा धावून गेला 

मराठमोळ्या पराक्रमाने, 

दिला दिलासा इतिहासाला .

--------------------------------------------------------------

If you salute your duty ,

You no need to salute anybody .

But.....

If You pollute your duty ..

You have to salute Everybody .

    - Abdul Kalam 


--------------------------------------------------------------

शिक्षणाबद्दल महात्मा गांधी यांचे विचार:


केवळ अक्षरओळख हा शिक्षणाचा अर्थ नाही.

अक्षरओळख हे शिक्षणाचे केवळ साधन आहे .मन लावून आपल्या सर्व इंद्रियाकडून उत्तम काम करवून घेण्याचे सामर्थ्य बालकाला येणे , हा शिक्षणाचा खरा अर्थ.

उपदेशापेक्षा उदाहरणांचा प्रभाव मुलांवर अधिक पडतो.तुमचे आचार -विचार ,तुमचा उत्साह ,तुमची आनंदी वृत्ती मुले नकळत आत्मसात करतात.

--------------------------------------------------------------

खरे शिक्षण -

इच्छाशक्तीचा प्रवाह  आणि अभिव्यक्ती आपल्या स्वतःच्या ताब्यात ज्यामुळे येतात,ते खरे शिक्षण .

योग्य वळण , सुसंस्कार देणारे ,मनोधैर्य वाढविणारे , स्वावलंबी बनवणारे असते ते खरे शिक्षण.

विचारांना कृतीची जोड देते ,ते खरे शिक्षण.

सांस्कृतिक परंपरांचे जतन करते , ते खरे शिक्षण .

मानवता,समता जपते ,ते खरे शिक्षण .

वैज्ञानिक झेप घेते , ते खरे शिक्षण .

नैतिकतेचा परिपोष करते ,ते खरे शिक्षण .


--------------------------------------------------------------



Sunday, October 23, 2022

पंडित जवाहरलाल नेहरू Pandit Jawaharlal Nehru



पंडित जवाहरलाल नेहरू

 Pandit Jawaharlal Nehru 

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान ,मुलांचे आवडते चाचा म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आज जन्मदिवस.त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आणि बालदिनाच्या निमित्ताने कार्यक्रमास उपस्थित असलेले अध्यक्ष महाशय माननीय ....... सर प्रमुख पाहुणे ..... सर आमचे सर्व गुरुजन वर्ग ,समोर उपस्थित असलेले श्रोते आणि माझ्या बालमित्रांनो ......

     ना सुकला गुलाब 

कधीच त्यांच्या रसिकतेचा ,

फुलासारखे जपत मुलांना 

घेतला ध्यास त्यांनी विकासाचा ........

झोकून दिला देह देशासाठी ..

विचार मनात फक्त स्वातंत्र्याचा....

मित्रहो ,मी कुणाबद्दल बोलतोय हे तुमच्या लक्षात आलेच असेल .अहो इंग्रजांच्या वाईट व जाचक हुकुमशाहीचा बिमोड करण्यासाठी अनेकांना लढा द्यावा लागला.असेच एक महान ,थोर व्यक्तिमत्व म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू.गांधीजींसोबत अहिंसेच्या मार्गाने इंग्रज सरकारला धारेवर धरणारे हे थोर नेते.पंडित जवाहरलाल नेहरू म्हटलं ,की प्रथम आठवतात ती गुलाबाची फुलं आणि गुलाबाच्या फुलांप्रमाणे गोंडस आणि निरागस मुलं!नेहरुंना गुलाबाची फुलं आणि फुलांसारखी निरागस मुलं फार आवडत असत.देशाचे उज्ज्वल भविष्य म्हणून मुलांकडे ते मोठ्या आशेने पाहत असत.देशाचे भविष्य ज्यांच्या हाती आहे,त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा ,असा त्यांचा ध्यास असायचा.14 नोव्हेंबर 1889 रोजी जन्मलेल्या पंडित नेहरूंनी आपले संपूर्ण आयुष्य देश स्वतंत्र करण्यासाठी आणि स्वतंत्र झालेल्या देशाला प्रगत बनवण्यासाठी खर्ची घातले.

           देश स्वतंत्र करण्यासाठी सत्याग्रह ,अहिंसा ,स्वदेशी,असहकार या मार्गांचा उपयोग करून त्यांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध लढा दिला.'सायमन गो बॅक'  म्हणत कॉंग्रेसने सायमन कमिशनला विरोध करत निदर्शने केली.यात पंडित नेहरूही सामील होते.या आंदोलनात पोलिसांनी केलेल्या लाठीमारात पंडितजी जखमी झाले.1942 मधील 'चलेजाव आंदोलनात' त्यांनी इंग्रजांना पळताभुई थोडी केली.स्वातंत्र्याच्या वेडाने झपाटलेली भारतीय जनता पाहून इंग्रजांचे धाबे दणाणले .या आंदोलनातील अनेकांना त्यात्यानी तुरुंगात टाकले.पंडित नेहरू तुरुंगात अडकले .देशहिताची कामे करणे अवघड झाले;परंतु ते डगमगले नाहीत.आमचे काहीही होवो;पण तुम्ही देशाच्या स्वातंत्र्याचे कार्य सुरु ठेवा,असा सल्ला त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिला.तुरुंगात असताना स्वस्थ न बसता त्यांनी लेखन केले.भारताच्या इतिहासावरील एक मोठा 'शोधग्रंथ' त्यांनी लिहिला.या ग्रंथाचे नाव होते 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया'.

नेहरू तुरुंगातून सुटले.स्वातंत्र्याचा लढा अधिक तीव्र झाला.स्वातंत्र्याचे महत्व जनतेला पटले होते.या गोऱ्या इंग्रजांना येथून हाकलून द्यायचेच , या एकमेव निर्धाराने जनता पेटून उठली होती.पंडित नेहरूंनी भारताच्या स्वातंत्र्याचा मांडलेला ठराव मंजूर करून घेण्यात आला .भारतीय जनतेचा रोष पाहता इंग्रजांना आता माघार घेण्याशिवाय पर्याय उरला नाही.

15 ऑगस्ट 19 47 साली भारत स्वतंत्र झाला.पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान झाले.स्वतंत्र भारताच्या अनेक समस्या म्हणजेच अज्ञान,बेकारी ,दुष्काळ अशा अनेक प्रश्नांची त्यांनी योग्यप्रकारे हाताळणी करत देशाची वैज्ञानिक प्रगती केली आणि शेतीचा विकास घडवून आणला.

त्यांच्या उदंड कार्याची दाखल घेत 1952 साली त्यांना 'भारतरत्न' या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मित्रांनो या थोर नेत्याने आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी वाहिले.27 मे 1964 रोजी ते आपल्यातून निघून गेले.खरे तर आपण आपल्या जीवनात देशहिताचे कार्य करणे ,देशबांधवांच्या हितासाठी कार्यरत राहणे आणि देशाला प्रगतशील बनविण्यात हातभार लावणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल ! 

जय हिंद ,जय भारत ! 







Related Posts

विविध विषयांवरील मराठी भाषणे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


तरुणाईचे प्रेरणास्थान : ए.पी.जे.अब्दुल कलाम


वाचनप्रेरणा दिन  : वाचनाचे महत्व 

 

वाचनप्रेरणा दिन  : वाचनाचे महत्व  Importance of Reading


डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार


डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जीवनपरिचय 

 

शहीद भगतसिंग माहितीपट


महात्मा गांधी मराठी भाषण


लाल बहादूरशास्त्री भाषण


महात्मा गांधी मराठी भाषण


भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान : इंदिरा गांधी


डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जीवनपरिचय १


डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जीवनपरिचय २

14 नोव्हेंबर -बालदिन विशेष माहितीपट - पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जीवनकार्य 


शिक्षकदिन मराठी भाषण


कर्मवीर भाऊराव पाटील मराठी भाषण


सुप्रसिद्ध व्यक्ती व त्यांचे उद्गार


डॉ.एन.डी.पाटील परिचय


सावित्रीबाई फुले मराठी भाषण


महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण


डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठी भाषण


डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार


लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज


छत्रपती शिवाजी महाराज


मराठी राजभाषा दिवस 



















Friday, October 21, 2022

बुद्धिमत्ता वर्गीकरण व ऑनलाईन टेस्ट

 


बुद्धिमता : वर्गीकरण 

'वर्गीकरण ' या प्रकारातील प्रत्येक प्रश्नात चार शब्द,चार आकृत्या किंवा चार संख्या दिलेल्या असतात.त्यातील तीन गोष्टींत तंतोतंत साम्य व सुसंगती आढळते,पण त्यातील एक बाब थोड्याफार फरकाने वेगळी असते.हे प्रश्न सोडवताना विद्यार्थ्यांनी सूक्ष्म निरीक्षण व विश्लेषण करून हा वेगळा शब्द किंवा संख्या किंवा आकृती ओळखायची असते.

गटात न बसणारा शब्द : वर्गीकरण 

1. वर्गीकरणाच्या या प्रश्नप्रकारात  प्राणी,पक्षी,पदार्थ झाडे,फुले,फळे,ग्रह अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो.

2.  या प्रकारात निरीक्षण शक्तीला जास्त वाव देण्यात येतो.प्रश्नात चार शब्दांपैकी तीन शब्दात साम्य असते आणि एक शब्द विसंगत म्हणजे वेगळा असतो.

3.  व्याकरणातील घटक,समानार्थी ,विरुद्धार्थी शब्द,समान गुणधर्म असंरे शब्द या सर्वांचीही माहिती असणे आवश्यक असते.

4.  या प्रश्नात दिलेल्या पर्यायातील प्रत्येक शब्द काळजीपूर्वक वाचून नेमका शब्द सूक्ष्म निरीक्षणाने वेगळा करणे शक्य असते.

आपण एक उदाहरण पाहू.

प्रश्न : खाली दिलेल्या पर्यायातील गटात न बसणारे पद ओळखा.

1.   मटकी 

2.   गहू 

3.  ज्वारी 

4.  बाजरी 

उत्तर : मटकी 

स्पष्टीकरण - वरील शब्दांपैकी गहू,ज्वारी,बाजरी ही तृणधान्ये आहेत ,तर मटकी हे कडधान्य  आहे.

म्हणून उत्तर पर्याय क्रमांक - 1 

हा गटात न बसणारा शब्द आहे.








Thursday, October 20, 2022

प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या वेळापत्रक जाहीर Teacher Transfer important update

 






महाराष्ट्र शासन
ग्रामविकास विभाग
बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ,
फोर्ट, मुंबई- ४००००१.
दूरध्वनी क्र. ०२२-२२०१ ७१०३
E-Mail- est14-rdd@mah.gov.in
क्रमांक. जिपव- २०२२/ प्र.क्र.२९/आस्था-१४

प्रति,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)

दिनांक २०
ऑक्टोबर २०२२.
विषय: सन २०२२ मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या
जिल्हांतर्गत बदल्यांबाबत वेळापत्रक.

संदर्भ : १) ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्र. जिप - ४८२० /प्र.क्र.२९० / आस्था. १४.

दिनांक ०७.०४.२०२१.
२) ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्र. जिपव-४८२०/प्र.क्र.२९० /आस्था.१४,
दिनांक ०४.०५.२०२२. ३) ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्र. जिपव- २०२२/प्र.क्र. २९/आस्था.१४. दिनांक २९.०६.२०२२.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याबाबतचे सुधारित धोरण संदर्भ क्र. १ येथील दिनांक ०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आले आहे.

सन २०२२ मध्ये होणान्या बदल्यांकरिता पदावधीची परिगणना दिनांक ३१ मे ऐवजी दिनांक ३० जून, २०२२ पर्यंत करण्यास संदर्भ क्र. २ येथील दिनांक ४.५.२०२२ च्या शासन निर्णयान्वये तरतुद करण्यात आली आहे. तसेच सन २०२२ मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी संदर्भ क्र. ३ येथील दिनांक २९.६.२०२२ च्या शासन निर्णयात विहित केलेल्या कालावधीनुसार बदल्यांबाबतची कार्यवाही संगणक प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. उक्त दिनांक ४,५.२०२२ व दिनांक २९.६.२०२२ च्या शासन निर्णयानुसार होणारी कार्यवाही

फक्त सन २०२२ मध्ये होणाऱ्या बदल्यांकरिताच लागू राहील. आता ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत

बदल्यांबाबत खालीलप्रमाणे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.










चौथी प्रज्ञाशोध परीक्षा सराव संच 02 4th Standard Talent Search Exam Test 02





चौथी प्रज्ञाशोध परीक्षा सराव परीक्षा 02 

4th Standard Talent Search Exam Test 02 


नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, या पोस्टमध्ये इयत्ता चौथी प्रज्ञाशोध परीक्षा सराव संच 02 दिला आहे. 

आपण तो नक्की सोडवा .

तो कसा सोडवावा याच्या सूचना खाली दिल्या आहेत .

 पूर्ण नाव - ---------------------------

या ठिकाणी विद्यार्थ्याने आपले नाव लिहावे.

नाव लिहिल्यानंतर Next या शब्दावर क्लिक करावे.

सर्व प्रश्न सोडवावे .

एखाद्या प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर आपल्या पालकांना विचारून किंवा समजून घेऊन सोडवावा .

(सर्व प्रश्न सोडवल्याशिवाय आपली उत्तरे   Submit   होत नाहीत.) 

शेवटी Submit करून 

View Score वर क्लिक करून आपले गुण पाहा.

बरोबर व चुकीची उत्तरे तपासा.

पुन्हा Test सोडवा.







 

Wednesday, October 19, 2022

दिवाली रोशनी का त्यौहार Essays on Diwali





 दिवाली एक खूबसूरत त्योहार है यह भारत में आयोजीत होनेवाले सबसे बडे और सबसे प्रतिष्ठित त्योहारों में से एक है । दिवाली ख़ुशी,जीत और एकता का जश्न मनाता है । दीपावली या दिवाली एक हिंदू त्योहार है और अक्टूबर या नवंबर में होता है । यह भारत और दुनिया के अन्य देशों में भी राष्ट्रीय अवकाश के रूप से मनाया जाता है 

ऐसा माना जाता है की यह रावण पर भगवान राम की जीत और  चौदह साल वनवास  के बाद घर लौटने की याद दिलाता है वास्तव में यह घटना बुराई की शक्तियों पर अच्छाई की विजय की शक्तियों का प्रतिनिधित्व है  

दिवाली के दिन देवी लक्ष्मी और भगवान गणेश की भी पूजा करते है । विघ्नों के नाश करने वाले भगवान  अपने ज्ञान और तेज़ के लिए पूजनीय है दिवाली के मौके पर धन  समृद्धी के लिए भी देवी लक्ष्मी जी की पूजा की जाती है व्यापारी इस नववर्ष को नई खाता बही खोलकर मनाते है 

बावजूद की यह एक हिन्दू त्यौहार है ,सभी धर्मो  लोग पटाखों और आतिशबाजी के साथ रंगारंग कार्यक्रम का आनंद  लिए एक साथ आते है लोग मिटटी के तेल के दीपक जलाते है और अपने घरों को सभी रंगो और आकारों की रोशनी से सजाते है जो उनके सामने दरवाजों और बाड़ों पर चमकते है ,एक मनोरम दृश्य बनातें है फुलझड़ियाँ रॉकेट फूलदान फव्वारें आतिशबाजी बच्चों के बिच लोकप्रिय है । बच्चे और किशोर अपने सबसे आकर्षक और सबसे सुन्दर पोशाक में तैय्यार होते है 

हम सभी उत्सव के बिच यह भूल जाते है की पटाखे फोड़ने से ध्वनि और प्रदुषण होता है  यह बच्चों के लिए बेहद हानिकारक है और इसके परिणामस्वरूप भयावह जलन हो सकती है पटाखें फोड़ने कई क्षेत्रों में वायु गुणवत्ता सूचकांक और दृशता कम हो जाती है जो घटना  होनेवाली कई दुर्घटनाओं में योगदान देता है नतीजा ,एक सुरक्षित और पर्यावरणीय रूप से जिम्मेदार दिवाली होना महत्वपूर्ण है 

दिवाली 'रोशनी का त्यौहार' के रूप में जाना जाता है और वास्तव में इस दिन पूरा ग्रह चमकता है 

Tuesday, October 18, 2022

पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा सराव संच 10

 



इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा 
विषय - बुद्धिमत्ता 
घटक - समसंबंध 

समसंबंध - 
       समसंबंध म्हणजे समान संबंध .या प्रश्नप्रकारामध्ये एकूण 4 पदांचा संबंध येतो. 
पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध असतो तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी असतो.

    उदा.         गोवा : पणजी : : आसाम :   ?

          1)  रांची 
          2)  कोहिमा 
          3)  दिसपूर 
          4)  कोहिमा

उत्तर : आसाम : दिसपूर 

हा राज्य व त्यांच्या राजधान्या यांचा संबंध आहे.

या प्रश्नप्रकारामधून विद्यार्थ्यांची तर्कशक्ती,आकलन , निरीक्षण ,अचूकता ,सामान्य ज्ञान इ.गुण लक्षात येतात.
या प्रश्नप्रकारामध्ये शब्दसंग्रह,आकृत्या  आणि संख्या यावर प्रश्न विचारले जातात.

शब्दसंग्रह - या प्रश्नप्रकारामध्ये पहिल्या दोन पदांचा संबंध लक्षात घेऊन तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी संबंध काढताना हा संबंध समानार्थी ,विरुद्धार्थी,समूहदर्शक 
शब्द ,रंग,रूप,वैशिष्ट्ये ,गुणधर्म ,आकार ,चव ,स्वभाव ,कार्य ,स्थान,दर्जा, क्रिया ,उपयोग,विशिष्ट क्रम , आवाज,अवयव याबाबतीत असू शकतो.
विद्यार्थ्यांनी भूगोल,,सामान्य विज्ञान,परिसर अभ्यास या विषयांचा सखोल अभ्यास करावा.तसेच अवांतर वाचनही करावे.
महत्वाच्या ऑनलाईन टेस्टस - 
आपल्याला खाली विविध घटकावर आधारित ऑनलाईन टेस्टस सोडवण्यासाठी दिल्या आहेत.
खाली दिलेल्या निळ्या लिंक्सवर क्लिक करून आपण त्या सोडवू शकता.









Important Online Tests for 5th Standard Scholarship Exam.
Related Posts 











 










माहे ऑक्टोबर 22च्या वेतनाबाबत आजचा महत्वाचा शासननिर्णय




माहे ऑक्टोबर, २०२२ चे माहे नोव्हेंबर, २०२२ मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन दिवाळी सणापूर्वी प्रदान करणेबाबत.......


महाराष्ट्र शासन वित्त विभाग


शासन परिपत्रक क्रमांका संकीर्ण २०२२/प्र.क्र.११२/ कोषा-प्रशा ५ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

तारीख: १८ ऑक्टोबर २०२२

संदर्भ : शासन निर्णय क्रमांक: डिडियो-१००५/प्र.७५/षा प्र.५. दि.२९.०८.२००५


शासन परिपत्रक:

दिवाळी सणाची सुरुवात यावर्षी दि. २२ ऑक्टोबर २०२२ पासून होत आहे. राज्य शासकीय अधिकारी/ कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारक यांना दिवाळी सण साजरा करताना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये याउद्देशाने माहे ऑक्टोबर २०२२ चे माहे नोव्हेंबर २०२२ मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन दिवाळी सणापूर्वी प्रदान करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


2. उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयातील परिच्छेद १९८० मधील तरतूद शिथील करून माहे ऑक्टोबर २०२२ या महिन्याचे वेतन आणि निवृत्तीवेतनाचे प्रदान दि. २१ ऑक्टोबर २०२२ रोजी करण्यास मान्यता देण्यात येत आहे.


3. यादृष्टीने मुंबई वित्तीय नियम, १९५९ मधील नियम ७१ च्या तरतुदी तसेच महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८ च्या खंड १ मधील नियम क्र. ३२८ मधील तरतुदी देखील शिथिल करण्यात येत आहेत. ४. वेतन देयकाचे प्रदान विहित कालावधीत होण्यासाठी सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी वेतन देयके त्वरीत कोषागारात सादर करावीत


4. सदर तरतूदी जिल्हा परिषद, मान्यताप्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे/अकृषी विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी/कर्मचारी, तसेच निवृतवेतनधारक यांना देखील लागू होतील.


६. संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी अधिदान व लेखा कार्यालय तसेच राज्यातील सर्व कोषागारे व उपकोषागारे यांना आवश्यक त्या सूचना तात्काळ निर्गमित कराव्यात.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या aharashtra.gov.in या


संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२२१०१८१३५९२८४००५ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

INDRAJEET SAMBHAJI GORE

इंद्रजित गोरे

शासनाचे उपसचिव