Monday, October 31, 2022

सरदार वल्लभभाई पटेल Sardar Vallabhabhai Patel







 सरदार वल्लभभाई पटेल

  Iron Man Of India 

 Sardar Vallabhbhai Patel 

 नमस्कार मित्रांनो ,आज आपण सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित माहिती पाहणार आहोत.

सरदार वल्लभभाई पटेल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे के वरिष्ठ नेता होते आणि भारतीय गणराज्य स्थापन करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता.वल्लभभाई झावेरभाई पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ मध्ये नडियाद ,गुजरातमध्ये झाला होता.त्यांच्या वडिलांचे नाव झावेरभाई आणि आईचे नाव लाढबाई असे होते.

वल्लभभाई पटेल यांचे वडील एक शेतकरी होते.त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या युद्धामध्ये 'झाशीच्या राणीच्या सेनेमध्ये कार्य केले होते.सरदार पटेल यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण आपल्या स्थानिक शाळेमधून आपल्या वडिलांबरोबर शेतीचे काम करत पूर्ण केले होते.सरदार पटेल लहानपणापासूनच बुद्धिमान ,साहसी आणि दृढसंकल्प ठेवणारे व्यक्ती होते.ते नेहमी अन्यायाविरुद्ध आवाज उठवत असत.याच गुणांमुळे त्यांना वकील बनायचे होते.

पैशांची कमी असूनही त्यांनी आपल्या मित्रांकडून पुस्तके मागून वकिलीचा अभ्यास केला आणि जिल्हा वकिलाची परीक्षा ते पास झाले.त्यांनी गोध्रा,गुजरातमध्ये आपली वकिली करायला सुरुवात केली.१९०२ मध्ये ते वलसाड येथे आले आणि जिल्हा मुख्यालयामध्ये यशस्वीपणे ८ वर्षे गुन्हेगारीवर वकिली केली.जेणेकरून त्यांनी आपल्या कुटुंबाला आर्थिक रूपाने स्थिर केले. 

पैशांची कमी दूर केल्यानंतर त्यांनी विवाह केला.त्यांना दोन मुले होती.सन १९१० मध्ये उच्च शिक्षण प्राप्त करण्यासाठी ते लंडनला गेले आणि तेथे परीक्षांमध्ये प्रथम आले.मग ते भारतात परतल्यावर अहमदाबाद येथे वकिली करू लागले.




जेव्हा सरदार पटेल १९१७ मध्ये महात्मा गांधीजींना भेटले तेव्हा त्यांचे जीवन पूर्णपणे बदलून गेले.जेव्हा त्यांनी गांधीजींचे स्वतंत्र भारताचे स्वप्न आणि अहिंसेचे तत्वज्ञान बघितले .सन १९१८ मध्ये गुजरातच्या खेडा येथे भयंकर दुष्काळ पडला होता .म्हणून शेतकऱ्यांनी इंग्रज सरकारला करमाफी करण्याचे निवेदन केले पण इंग्रज सरकारने ते नाकारले.तेव्हा सरदार पटेल यांनी शेतकऱ्यांचे नेतृत्व केले आणि शेतकऱ्यांना कर न देण्यास सांगितले.सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासमोर इंग्रज सरकारला माघार घ्यावी लागली आणि कर माफ करावा लागला.हे सरदार पटेल यांचे पहिले मोठे यश होते.



 बार्डोली सत्याग्रहाच्या निमित्ताने सन १९२८ मध्ये गुजरातमध्ये एक प्रमुख किसान आंदोलन झाले,ज्याचे नेतृत्व स्वतः सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले होते.या आंदोलनामध्ये इंग्रज सरकारला माघार घ्यायला भाग पाडले होते आणि सरदार पटेल यांच्यामुळे शेतकऱ्यांचा विजय झाला होता.या सत्याग्रहाच्या यशानंतर लोकांनी वल्लभभाई पटेल यांना 'सरदार' ही उपाधी दिली होती,ज्याचा अर्थ आपला मुख्य किंवा आपला राजा असा होतो.तेव्हापासून त्यांना सरदार वल्लभभाई पटेल या नावाने ओळखले जाऊ लागले.

सरदार वल्लभभाई पटेल यांनी इंग्रज सरकारच्या विरोधात खूप सारी आंदोलने केली.१९४२ मध्ये महात्मा  गांधीजींच्या 'भारत छोडो' आंदोलनामध्ये सरदार पटेल यांनी पूर्ण सहकार्य केले.त्यांना याच कारणामुळे तुरुंगवासदेखील झाला होता.

     स्वातंत्र्याच्या आधी आपला भारत देश ५८४ राज्यांमध्ये वाटला गेला होता.सरदार पटेल यांनी या राज्यांना एकत्र आणण्यावर जोर दिला होता आणि सर्व राज्यांना इंग्रजसरकारविरुद्ध होण्यास सांगितले होते.ते पूर्ण देशाला एक करण्याच्या प्रयत्नांमध्ये होते.त्यांना Iron Man Of India भारताचे पोलादी पुरुष ही उपाधी दिली होती.कारण आज आपला भारत देश एकसंघ भारत देश पाहतो आहोत तो सरदार पटेल यांच्या या कार्यामुळेच.

१९४७ मध्ये ते स्वतंत्र भारताचे पहिले उपप्रधानमंत्री आणि गृहमंत्री बनले.त्यांनी IAS आणि IPS चि स्थापना करण्यामध्ये सहाय्य केले होते.म्हणून त्यांना भारतीय सेवेचा संरक्षक संत असेही म्हटले जाते.

१५ डिसेंबर १९५० मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.त्यांच्या अंतिम संस्कारासाठी १० लाख लोक आले होते.त्यांना त्यांच्या कार्यामुळे 'भारतरत्न' हा पुरस्कार देण्यात आला होता.भारतात खूप सारी महाविद्यालये आणि  संस्था  त्यांच्या नावाने उघडण्यात आल्या आहेत.

  गुजरातमध्ये सरदार सरोवर बांध आहे जो नर्मदा नदीवर स्थित आहे.तिथे सरदार पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा बांधण्यात आला आहे.'Statue Of Unity' 'स्टॅच्यू ऑफ युनिटी ' या नावाने तो प्रसिध्द आहे.



सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस 'राष्ट्रीय एकता दिवस' या नावाने साजरा केला जातो.

धन्यवाद ! 


आपल्याला हा लेख कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा.

No comments:

Post a Comment